शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

दिवाळखोरीतील ठेकेदाराला उड्डाणपुलाचे काम, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:23 IST

तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याचे काम दिवळखोरीत गेलेल्या ठेकेदारास देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याचे काम दिवळखोरीत गेलेल्या ठेकेदारास देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी ३० कोटी ५४ लाख रुपये खर्च येणार आहे. ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. अपघातामध्ये अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. प्रतिदिन वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथील समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनीही यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. वाढते अपघात, नागरिकांची होणारी गैरसोय व वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ६५४ मीटर रुंद, १७.२० मीटर रुंद असा चार मार्गिका असणारा पूल बांधण्यात येणार आहे. उड्डाणपुलाखाली २२ मीटर रुंद व ३.१ मीटर उंच अशा दोन मार्गिका नागरिकांना स्टेशनकडे जाण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर गतिशील योजनेअंतर्गत हे काम करण्यात येणार आहे.उड्डाणापूल उभारण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले आहे तो ठेकेदार दिवाळखोरीत गेला आहे. प्रशासनाने याविषयी विधितज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असता ही निविदा मंजूर करावी किंवा नाही, याबाबत महापालिकेने निर्णय द्यावा, असा अभिप्राय दिला होता. यानंतरही काम संबंधित ठेकेदाराला दिले आहे.>वाहतूक सुरळीत होणारठाणे-बेलापूर रोडवरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने २००७ मध्येच या रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कोपरखैरणे-घणसोली दरम्यान उड्डाणपूल, सविता केमिकलजवळ उड्डाणपूल, महापे येथे भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने तुर्भेमध्ये उड्डाणपूल बांधल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.