शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतल्या महिला असुरक्षित?; अडीच वर्षांत ३७८ बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 00:16 IST

फूस लावून पळवल्या जात आहेत मुली

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील अडीच वर्षात नवी मुंबईसह पनवेल, उरणमध्ये बलात्काराच्या ३७८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त होत आहे.उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा देशभरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही बलात्कार करून हत्येच्या घटना देशात घडल्या आहेत. मात्र, सातत्याने घडणाºया अशा घटनांमुळे राज्यातीलही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशातच नवी मुंबईत समोर येऊ लागलेल्या बलात्काराच्या घटनांनी स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया शहराला गालबोट लागत चालले आहे. नुकतेच नेरुळ येथे १४ वर्षीय मुलीवर सातत्याने बलात्कार करून तिला गरोदर केल्याची घटना उघडकीस आली.दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी तिचा गर्भपात करण्याचाही प्रयत्न झाला, परंतु हाथरस येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर येताच शहरात खळबळ उडाली. त्यामुळे नवी मुंबईतही महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मागील अडीच वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बलात्काराच्या ३७८ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २०१८ मध्ये १५५ व २०१९ मध्ये १५३ घटना घडल्या आहेत, तर चालू वर्षात आॅगस्ट अखेरपर्यंत बलात्काराच्या ७० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू असतानाही त्या कालावधीतही बलात्काराच्या घटना सुरूच होत्या. मागील दोन वर्षांत बलात्काराच्या घडलेल्या घटनांमध्ये जून, जुलै व आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत सर्वाधिक गुन्हे घडले आहेत.बलात्काराच्या घडलेल्या बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी वेळोवेळील उकलही केलेली आहे. त्यात परिचित व अपरिचित व्यक्तींचा हात आढळून आलेला आहे, तर अडीच वर्षांत ५८० महिलांनी त्यांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार, २०१८ मध्ये २२६, २०१९ मध्ये २५० तर चालू वर्षात आॅगस्टपर्यंत १०४ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.अल्पवयीन मुली वासनेच्या बळी : राज्यभर खळबळ उडवणारा सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशी हाही मीरा रोड येथून येऊन नवी मुंबईतील अल्पवयीन मुलींना स्वत:च्या वासनेला बळी पाडत होता. प्रवासादरम्यान रस्ता चुकलेल्या महिलेला मदतीच्या एक तासात दोनदा गँगरेप झाल्याचीही घटना फेब्रुवारी महिन्यात रबाळे एमआयडीसी हद्दीत घडली होती. यावरून महिलांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवतील, असे गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे. परिणामी, २१ व्या शतकातली स्मार्ट सिटी महिलांसाठी असुरक्षित ठरू लागल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे.दाखल झालेले गुन्हेगुन्हा २०२० २०१९ २०१८बलात्कार ७० १५३ १५५विनयभंग १०४ २५० २२६अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.चालू वर्षात आॅगस्टपर्यंत १०४ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचेही गांभीर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार