शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नवी मुंबईत महिला राजकारण्यांचा दबदबा; पंचवीस वर्षांमध्ये ४ महिला महापौरपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 23:50 IST

दोन वेळा भूषविले स्थायी समितीचे सभापतीपद; १७३ महिलांना मिळाली संधी

नामदेव मोरे 

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणामध्ये महिलांनीही त्यांचा ठसा उमटविला आहे. २५ वर्षांमध्ये तब्बल १७३ महिला नगरसेविका झाल्या आहेत. चार वेळा महापौर, तीन वेळा उपमहापौर व दोन वेळा तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे सभापतीपदही महिलांनी भूषविले आहे. तब्बल १० महिलांनी तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासूनच महिला नगरसेविकांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे. २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये तब्बल १७३ महिला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत. पालिकेमधील सर्व महत्त्वाची पदे महिलांनी भूषविली असून शहरहितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सुषमा दंडे, विजया म्हात्रे यांनी महिलाही महापौरपद प्रभावीपणे सांभाळू शकतात हे दाखवून दिले. त्यांच्यानंतर महापौर झालेल्या मनीषा भोईर व अंजली भोईर यांच्या कार्यकाळात शहरात विकासाचे व्हिजन राबविण्यात आले. स्कूल, व्हिजन, उद्यान व्हिजन, तलाव व्हिजन, रोड व्हिजन अंतर्गत कामे याच काळात सुरू झाली. मोरबे ते दिघा जलवाहिनी, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, शहरात मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे, ठाणे-बेलापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे धोरण व देशातील पहिले दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्रही याच पाच वर्षांच्या कालावधीमध्ये उभारण्यात आले आहे.

राज्यातील व देशातील बहुतांश महानगरपालिकांमध्येही महापौर, उपमहापौर पदावर महिलांची वर्णी लावली जाते. परंतु महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाºया स्थायी समितीच्या सभापतीपदावर महिलांची वर्णी लावली जात नाही. नवी मुंबईमध्ये मागील पाच वर्षांमध्ये नेत्रा शिर्के व शुभांगी पाटील यांनी यशस्वीपणे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. आतापर्यंत तीन वेळा उपमहापौरपद महिलांनी भूषविले आहे. विद्यमान उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांचे कामही प्रभावी आहे. येणाºया निवडणुकीमध्येही १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. यामुळे सभागृहात महिला जास्त असणार आहे.मंदा म्हात्रे सर्वात यशस्वी राजकारणीनवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत १७३ नगरसेविका निवडून आल्या आहेत. या सर्वांमध्ये मंदा म्हात्रे या सर्वात यशस्वी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. १९९५ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये नगरसेविका झालेल्या मंदा म्हात्रे यांनी पालिकेत सभापतीपदही भूषविले आहे. एकदा विधान परिषद सदस्या व विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वेळा बेलापूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये स्वत:चा ठसा उमटविला आहे.१५ महिलांना दोन वेळा संधीमहापालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत उषा भोईर, कमलताई पाटील, मनीषा भोईर, राधा कुलकर्णी, वंदना सोनावणे, भारती कोळी, विजया ठाकूर, नीलम जगताप, वर्षा नाईक, बेबीताई पाटील, रोहिणी शिंदे, मोनिका पाटील, शुभांगी पाटील, कोमल वास्कर, सरोज पाटील या दोन वेळा निवडून आल्या आहेत.