शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवण्यासाठी प्रयत्न करणार- नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:24 IST

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे.

नवी मुंबई : कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे. घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून पोलिसांनी २८४ दाम्पत्यांना सुखी संसाराचा कानमंत्र दिला आहे. अशा दाम्पत्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या नेरुळमध्ये उपस्थित होत्या.गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षामार्फत गतवर्षात २८४ संसारांचा काडीमोड थांबवला आहे. पती-पत्नीमधील वादाच्या प्राप्त तक्रारीवरून त्यांचे समुपदेशन करून गैरसमज दूर केले आहेत. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरीलही ताण कमी झाला आहे. त्यानुसार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नव्याने सुखाचा संसार थाटणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्याकरिता नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नेरुळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास विधानपरिषद उपसभापती नीलम गोºहे, पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, पंकज डहाणे, अशोक दुधे, सुरेश लोखंडे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते. या वेळी नीलम गोºहे यांनी पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक करत आपल्या आईवडिलांप्रमाणेच पती-पत्नीच्या आईवडिलांचाही सन्मान केल्यास बरेच कौटुंबिकवाद मिटतील, असा उपस्थितांना सल्ला दिला. मात्र, जे दाम्पत्य काही केल्या एकत्र होण्याच्या मन:स्थितीत नसतात त्यांच्या वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याची भावनाव्यक्त केली.अशा अनेक दाम्पत्यांचे खटले पोटगी, हुंडाबळी, मुलांची कस्टडी यासह विविध कायद्यांतर्गत एकाच वेळी वेगवेगळ्या कोर्टात चालतात. यामध्ये निकाल लागण्यास होणाºया विलंबाचा मनस्ताप पती-पत्नीसह त्यांच्या मुलांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे असे विविध खटले एकत्र चालवले जावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नीलम गोºहे म्हणाल्या. तर घटस्फोटाच्या प्रयत्नात असलेल्या दाम्पत्यांच्या मुलांना मानसिक आधार देण्यासाठीचाही आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.याप्रसंगी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही बदलत्या कुटुंब व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. हल्ली प्रत्येक पती-पत्नीला एकमेकांपासून ‘स्पेस’ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, दोघांनाही हा स्पेस नेमका हवा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लग्नानंतर सामंजस्याने राहायचे आणि संसार टिकवायचे दोघांवरही अवलंबून असते. त्यामुळे संबंध तुटण्यापूर्वीच सावरणे गरजेचे आहे. अन्यथा एकदा तुटलेले संबंध जोडल्यानंतरही त्याच्या गाठी आयुष्यभर राहतात, असा सल्लाही त्यांनी दिला.अल्पवयीन मुला-मुलींकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असताना पालकांचे त्यांच्यावर नियंत्रण हवे. अन्यथा त्यांचे तंत्रज्ञानाविषयीचे अज्ञान एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत सदैव सर्तक राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे