शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवण्यासाठी प्रयत्न करणार- नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:24 IST

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे.

नवी मुंबई : कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे. घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून पोलिसांनी २८४ दाम्पत्यांना सुखी संसाराचा कानमंत्र दिला आहे. अशा दाम्पत्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या नेरुळमध्ये उपस्थित होत्या.गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षामार्फत गतवर्षात २८४ संसारांचा काडीमोड थांबवला आहे. पती-पत्नीमधील वादाच्या प्राप्त तक्रारीवरून त्यांचे समुपदेशन करून गैरसमज दूर केले आहेत. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरीलही ताण कमी झाला आहे. त्यानुसार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नव्याने सुखाचा संसार थाटणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्याकरिता नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नेरुळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास विधानपरिषद उपसभापती नीलम गोºहे, पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, पंकज डहाणे, अशोक दुधे, सुरेश लोखंडे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते. या वेळी नीलम गोºहे यांनी पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक करत आपल्या आईवडिलांप्रमाणेच पती-पत्नीच्या आईवडिलांचाही सन्मान केल्यास बरेच कौटुंबिकवाद मिटतील, असा उपस्थितांना सल्ला दिला. मात्र, जे दाम्पत्य काही केल्या एकत्र होण्याच्या मन:स्थितीत नसतात त्यांच्या वेगळे होण्यातच दोघांचेही हित असल्याची भावनाव्यक्त केली.अशा अनेक दाम्पत्यांचे खटले पोटगी, हुंडाबळी, मुलांची कस्टडी यासह विविध कायद्यांतर्गत एकाच वेळी वेगवेगळ्या कोर्टात चालतात. यामध्ये निकाल लागण्यास होणाºया विलंबाचा मनस्ताप पती-पत्नीसह त्यांच्या मुलांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे असे विविध खटले एकत्र चालवले जावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नीलम गोºहे म्हणाल्या. तर घटस्फोटाच्या प्रयत्नात असलेल्या दाम्पत्यांच्या मुलांना मानसिक आधार देण्यासाठीचाही आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.याप्रसंगी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही बदलत्या कुटुंब व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. हल्ली प्रत्येक पती-पत्नीला एकमेकांपासून ‘स्पेस’ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, दोघांनाही हा स्पेस नेमका हवा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लग्नानंतर सामंजस्याने राहायचे आणि संसार टिकवायचे दोघांवरही अवलंबून असते. त्यामुळे संबंध तुटण्यापूर्वीच सावरणे गरजेचे आहे. अन्यथा एकदा तुटलेले संबंध जोडल्यानंतरही त्याच्या गाठी आयुष्यभर राहतात, असा सल्लाही त्यांनी दिला.अल्पवयीन मुला-मुलींकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असताना पालकांचे त्यांच्यावर नियंत्रण हवे. अन्यथा त्यांचे तंत्रज्ञानाविषयीचे अज्ञान एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत सदैव सर्तक राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे