शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कांदा उत्पादकांसह ग्राहकांनाही दिलासा देणार; अब्दूल सत्तार यांचे आश्वासन

By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 19:30 IST

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याची स्पष्टोक्ती

नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देण्याबरोबर ग्राहकांनाही महागाईची झळ बसणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. दोन्ही घटकांना न्याय दिला जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील समस्या समजून घेतल्यानंतर पणनमंत्र्यांनी मार्केटमधील कांद्याची आवक व बाजारभावाची माहिती घेतली. व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १० ते २४ रूपयांपर्यंत चांगल्या कांद्याला भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटमध्ये ज्या भावाने कांद्याची विक्री होत आहे, त्यापेक्षा जास्त भाव देवून केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. २४ रुपये दराने ही खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून दिला जाईल. दुसरीकडे ग्राहकांनाही महागाईची झळ बसणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविल्या आहेत. कांद्याचा साठा व बाजारभाव यावर लक्ष ठेवले जात आहे. शेतकरी व ग्राहक दोघांच्या हिताची काळजी घेत असल्याचेही सत्तार यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये कोठून किती कांदा येतो याचीही विचारणा केली. व्यापारी, माथाडी कामगार यांच्याशी चर्चा करून समस्या समजून घेतल्या.मुंबईत १००५ टन कांद्याची आवक

मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी फक्त ५३२ टन कांद्याची आवक झाली होती. बुधवारी आवक वाढली आहे. बाजार समितीमध्ये १००५ टन कांद्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये १० रुपयांपासून ते २४ रूपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत आहे.

टॅग्स :onionकांदाAbdul Sattarअब्दुल सत्तार