शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कांदा उत्पादकांसह ग्राहकांनाही दिलासा देणार; अब्दूल सत्तार यांचे आश्वासन

By नामदेव मोरे | Updated: August 23, 2023 19:30 IST

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याची स्पष्टोक्ती

नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देण्याबरोबर ग्राहकांनाही महागाईची झळ बसणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. दोन्ही घटकांना न्याय दिला जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील समस्या समजून घेतल्यानंतर पणनमंत्र्यांनी मार्केटमधील कांद्याची आवक व बाजारभावाची माहिती घेतली. व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १० ते २४ रूपयांपर्यंत चांगल्या कांद्याला भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटमध्ये ज्या भावाने कांद्याची विक्री होत आहे, त्यापेक्षा जास्त भाव देवून केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. २४ रुपये दराने ही खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून दिला जाईल. दुसरीकडे ग्राहकांनाही महागाईची झळ बसणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविल्या आहेत. कांद्याचा साठा व बाजारभाव यावर लक्ष ठेवले जात आहे. शेतकरी व ग्राहक दोघांच्या हिताची काळजी घेत असल्याचेही सत्तार यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये कोठून किती कांदा येतो याचीही विचारणा केली. व्यापारी, माथाडी कामगार यांच्याशी चर्चा करून समस्या समजून घेतल्या.मुंबईत १००५ टन कांद्याची आवक

मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी फक्त ५३२ टन कांद्याची आवक झाली होती. बुधवारी आवक वाढली आहे. बाजार समितीमध्ये १००५ टन कांद्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये १० रुपयांपासून ते २४ रूपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत आहे.

टॅग्स :onionकांदाAbdul Sattarअब्दुल सत्तार