शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

ऋण काढून होणार सण साजरा?

By admin | Updated: October 30, 2015 23:38 IST

दिवाळीसाठी घर, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, मिठाई इ. च्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या दृष्टीने बाजारपेठा हळुहळू सजु लागल्या असल्या तरी रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर

पालघर : दिवाळीसाठी घर, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, मिठाई इ. च्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या दृष्टीने बाजारपेठा हळुहळू सजु लागल्या असल्या तरी रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर, भाववाढीने त्रस्त जनता, बाजारपेठेवरील मंदीचे सावट यामुळे सर्वत्र खरेदी विक्रीच्या सर्वच व्यवहाराला हुडहूडीने ग्रासले आहे. दिवाळीच्या झगमगाटीच्या वातावरणात सर्वसामान्यांच्या उत्साह व आनंदावर त्यामुळे विरजण पडण्याची चिन्हे आहेत.दिवाळी हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होतो. त्यासाठी आपल्या आर्थिक कुवतीनुसार बेत आखले जात असतात. पालघर जिल्ह्णातील आठही तालुक्यातील बाजारपेठा, आकाशकंदील, लायटींग, फराळाचे साहित्य, कपडे, सोने खरेदीसाठी सजल्या आहेत.पालघर जिल्ह्णात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या लहरी वातावरणामुळे दुष्काळजन्य परिस्थिती नसली तरी शंभर टक्के पीक हातात लागेल याची पुर्ण शाश्वती नसल्याचे चित्र आहे. आजही अधुनमधून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्रूाने लहरी वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील भाताचे पीक पडून आहे. दिवाळी तोंडवर आल्याने हातात पैसे नसल्याने विक्रमगड, जव्हार, मोखाडा इ. भागातील शेकडो कुटूंबे रोजगारासाठी शहरामध्ये दाखल झाली आहेत. जिल्ह्णात वसईपासून ते डहाणूच्या झाई-बोर्डीच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमार राहत असून ३ ते ४ हजार लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जात आहे. या व्यवसायामध्ये सुमारे ६० ते ७० हजार कामगार व त्यांच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबुन आहे. परंतु मत्स्य उत्पादनात मोठी घट होत असल्याने तसेच पर्ससीन नेटधारक, ट्रॉलर्स या महाकाय नौकाद्वारे अपरीमीत मासेमारी होत असल्याने किनारपट्टीवरील पारंपारीक छोटा मच्छीमारास पुरेसे मासे मिळत नसल्याने तो कर्जबाजारी बनला आहे. त्यातच इंधन, बर्फ, साहित्य इ. मोठी भाववाढ झाल्याने उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावर पडून आहेत.एकंदरीत पाहत भाववाढ, महागाईच्या गर्तेत हा सण सापडला असला तरी दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने काही प्रमाणात खरेदीला मर्यादा आणून त्या दृष्टीने हा सण साजरा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रश्न करणार असल्याचे अदिती चव्हाण या महिलेने सांगितले. तर बाजारपेठेत सध्या मंदी असली तरी काही दिवसात खरेदीला वेग येईल अशी आशा प्रकाश स्टोर्सच्या मालकाने सांगितले. (वार्ताहर)तारापूर औद्योगिक वसाहत, बिडको वसाहत, जेनेसीस, शक्ती उद्योग औद्योगिक वसाहत पालघर, तलासरी, वाडा, मनोर, वालीव इ. भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने असून लाखो स्थानिक व परराज्यातील कामगार या कारखान्यात काम करतात. परंतु बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्याने उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे येथेही काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. या कारखान्यामध्ये राजकीय व धनदांडग्यांचे कंत्राटपद्धतीने कामगार पुरविण्याचे ठेके असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. त्यातच दिवाळीच्या सणात हक्काचा मिळणारा बोनसही हद्दपार झाल्याने हाती पडत असलेल्या तुटपूंज्या पगारावर यावर्षी दिवाळी साजरी करण्याची वेळ कामगार वर्गावर आली आहे.