शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला? आमदार मंदा म्हात्रे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 04:06 IST

इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई : इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. नगरसेवकांनी स्वखर्चातून स्वच्छतेचे धडे घ्यावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना बुधवारी एक निवेदन दिले असून, जनतेच्या पैशांतून आयोजित केलेला हा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे.नवी मुंबई हे सुनियोजित व तितकेच स्वच्छ शहर आहे. गेल्या वर्षी देशातील आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईला मान मिळाला. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून प्रत्येकाने स्वत:पासून स्वच्छतेची सवय लावली तर पहिला क्रमांक पटकवायला वेळ लागणार नाही. परंतु प्रशासनासह लोकप्रतिनिधींना स्वच्छतेचे वावडे असल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या काळात गावागावात फिरण्याचा योग आला. या दरम्यान, गाव-गावठाणातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे पाहावयास मिळाले. प्रत्यक्ष आपली भेट घेवून ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर स्वच्छतेच्या कामाला युध्दपातळीवर सुरुवात करणे अपेक्षित होते. तसे झाले असते, तर अन्य शहराने राबविलेल्या स्वच्छताविषयक कामांची पाहणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दौरा आयोेजित करण्याची वेळ आली नसती, असा टोला मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे लगावला आहे. शहरात अनेक नागरी प्रश्न जैसे थे आहेत. रुग्णालयांत अत्यावश्यक सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची दुकानदारी तेजीत आहे. सर्वसामान्य रुग्णांची लूट होत आहे.रस्ते व पदपथांची दुरवस्था झाली आहे. उद्यान व खेळाच्या मैदानांची दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांनी दिलेल्या कराच्या रकमेतून या सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित असते. मात्र पाहणी दौºयाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा घाट प्रशासन आणि सत्ताधाºयांनी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.केवळ पामबीच मार्गाची पाहणी करून शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला नाही, याचे भान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी बाळगायला हवे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली तर हे शहर देशातच नव्हे, तर जगात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जनतेच्या पैशांतून आयोजित केलेला हा अभ्यास दौरा अनाठायी व नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारा असल्याने तो रद्द करून हा निधी विकासकामांसाठी वापरावा, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे ४ ते ६ आॅक्टोबर दरम्यान नियोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या इंदूर दौºयावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रे