शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला? आमदार मंदा म्हात्रे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 04:06 IST

इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई : इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. नगरसेवकांनी स्वखर्चातून स्वच्छतेचे धडे घ्यावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना बुधवारी एक निवेदन दिले असून, जनतेच्या पैशांतून आयोजित केलेला हा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे.नवी मुंबई हे सुनियोजित व तितकेच स्वच्छ शहर आहे. गेल्या वर्षी देशातील आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईला मान मिळाला. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून प्रत्येकाने स्वत:पासून स्वच्छतेची सवय लावली तर पहिला क्रमांक पटकवायला वेळ लागणार नाही. परंतु प्रशासनासह लोकप्रतिनिधींना स्वच्छतेचे वावडे असल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या काळात गावागावात फिरण्याचा योग आला. या दरम्यान, गाव-गावठाणातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे पाहावयास मिळाले. प्रत्यक्ष आपली भेट घेवून ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर स्वच्छतेच्या कामाला युध्दपातळीवर सुरुवात करणे अपेक्षित होते. तसे झाले असते, तर अन्य शहराने राबविलेल्या स्वच्छताविषयक कामांची पाहणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दौरा आयोेजित करण्याची वेळ आली नसती, असा टोला मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे लगावला आहे. शहरात अनेक नागरी प्रश्न जैसे थे आहेत. रुग्णालयांत अत्यावश्यक सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची दुकानदारी तेजीत आहे. सर्वसामान्य रुग्णांची लूट होत आहे.रस्ते व पदपथांची दुरवस्था झाली आहे. उद्यान व खेळाच्या मैदानांची दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांनी दिलेल्या कराच्या रकमेतून या सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित असते. मात्र पाहणी दौºयाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा घाट प्रशासन आणि सत्ताधाºयांनी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.केवळ पामबीच मार्गाची पाहणी करून शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला नाही, याचे भान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी बाळगायला हवे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली तर हे शहर देशातच नव्हे, तर जगात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जनतेच्या पैशांतून आयोजित केलेला हा अभ्यास दौरा अनाठायी व नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारा असल्याने तो रद्द करून हा निधी विकासकामांसाठी वापरावा, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे ४ ते ६ आॅक्टोबर दरम्यान नियोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या इंदूर दौºयावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रे