शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न

By नारायण जाधव | Updated: December 16, 2022 07:29 IST

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत.

- नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जगातील विविध देशांनी स्थापन केलेल्या जी-२० परिषदेच्या २०२२-२३ या वर्षांचे यजमानपद भारताकडे आल्यानंतर तिच्या बैठकांचा प्रारंभ मुंबईत झाला. यात मुंबईसह पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे.  मात्र, नवी मुंबईत जी-२० ची बैठक सोडाच; पण प्रतिनिधींची साधी भेट ठेवलेली नाही. यावरून शहरवासीयांत नाराजी आहे. जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची बैठक नाही किमान नवी मुंबई शहरात भेट ठेवावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत. वास्तविक, नवी मुंबई शहर देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानात सातत्याने पहिल्या दहामध्ये येणारे राज्यातील एकमेव सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. 

प्रतिनिधींच्या भेटीसाठी सरकारला करणार विनंतीआशिया खंडातील सर्वात मोठी टीटीसी औद्योगिक वसाहत, रिलायन्स समूहाचा पसारा, केंद्र सरकारचे वाशी स्थानकातील इन्फोटेक पार्क, महाराष्ट्र सरकारचे  एमआयडीसीतील मिलेनियम बिझनेस पार्क, सिडकोने बांधलेली देखणी रेल्वेस्थानके दाखविता येतील. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज कसे चालते, ती महामुंंबईतील तीन ते चार कोटी लोकांची भूक कशी भागविते, हे जी-२० समूहाला दाखविण्यासाठी प्रतिनिधींच्या भेटी नवी मुंबईत व्हाव्यात, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती करू, असे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले.

n जेएनपीटी बंदर, वेगाने आकार घेत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, परिसरातील लॉजिस्टिक पार्क, मेडिकल व अभियांत्रिक शिक्षण संस्थाचे जाळे जी-२० समूहाला दाखविण्याची संधी असल्याचे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या.n मुंबई हे जुने शहर आहे. पण नवी मुंबई हे नवे अत्याधुनिक शहर आहे. आता नैना विकसित होत आहे. n शहरातील लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न करून नवी मुंबईला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यावे, असे मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना महाराष्ट्रचे महासचिव प्रकाश बाविस्कर म्हणाले.