शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न

By नारायण जाधव | Updated: December 16, 2022 07:29 IST

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत.

- नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जगातील विविध देशांनी स्थापन केलेल्या जी-२० परिषदेच्या २०२२-२३ या वर्षांचे यजमानपद भारताकडे आल्यानंतर तिच्या बैठकांचा प्रारंभ मुंबईत झाला. यात मुंबईसह पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे.  मात्र, नवी मुंबईत जी-२० ची बैठक सोडाच; पण प्रतिनिधींची साधी भेट ठेवलेली नाही. यावरून शहरवासीयांत नाराजी आहे. जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची बैठक नाही किमान नवी मुंबई शहरात भेट ठेवावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींसह बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत. वास्तविक, नवी मुंबई शहर देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानात सातत्याने पहिल्या दहामध्ये येणारे राज्यातील एकमेव सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. 

प्रतिनिधींच्या भेटीसाठी सरकारला करणार विनंतीआशिया खंडातील सर्वात मोठी टीटीसी औद्योगिक वसाहत, रिलायन्स समूहाचा पसारा, केंद्र सरकारचे वाशी स्थानकातील इन्फोटेक पार्क, महाराष्ट्र सरकारचे  एमआयडीसीतील मिलेनियम बिझनेस पार्क, सिडकोने बांधलेली देखणी रेल्वेस्थानके दाखविता येतील. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज कसे चालते, ती महामुंंबईतील तीन ते चार कोटी लोकांची भूक कशी भागविते, हे जी-२० समूहाला दाखविण्यासाठी प्रतिनिधींच्या भेटी नवी मुंबईत व्हाव्यात, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती करू, असे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले.

n जेएनपीटी बंदर, वेगाने आकार घेत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, परिसरातील लॉजिस्टिक पार्क, मेडिकल व अभियांत्रिक शिक्षण संस्थाचे जाळे जी-२० समूहाला दाखविण्याची संधी असल्याचे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या.n मुंबई हे जुने शहर आहे. पण नवी मुंबई हे नवे अत्याधुनिक शहर आहे. आता नैना विकसित होत आहे. n शहरातील लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न करून नवी मुंबईला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यावे, असे मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना महाराष्ट्रचे महासचिव प्रकाश बाविस्कर म्हणाले.