शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

मावळमधील घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:12 IST

लोकसभा निवडणूक : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात उत्साह; आता निकालाबाबत उत्सुकता

हणमंत पाटीलपिंपरी : मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत २ टक्क्याने घसरला आहे. साधारण शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला असून, ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह चांगला होता. त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे.

राज्यातील चौथ्या टप्प्यात मुंबई, उत्तर महाराष्ट्रासह शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुका सोमवारी झाल्या. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची व लक्षवेधी ठरली आहे. मावळ मतदारसंघाच्या रचनेत घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा, तसेच घाटाखालील पनवेल, उरण व कर्जत मतदारसंघ आहेत. सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन भाजपा, दोन शिवसेना व एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना युतीची ताकद अधिक आहे. मात्र, राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसची साथ मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चुरशीची लढत दिली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत उरण, कर्जत व मावळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होती. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का ६०.११ टक्के झाला होता. यंदा मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात चुरस असूनही मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला आहे. साधारण सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का ५८.२१ होता. यामध्ये सर्वाधिक मतदान उरणमध्ये ६१.८० टक्के आणि मावळ मतदारसंघात ६१.२८ टक्के झालेले आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदानाची टक्केवारी गतपंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत ८ ते १० टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, घाटावर पिंपरी व चिंचवड मतदारसंघात दोन ते तीन टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे.

गतपंचवार्षिक निवडणुकीत घाटाखाली उरण मतदारसंघात ७१.८४ टक्के, कर्जत ६८.३८ टक्के आणि पनवेल ५८.४८ अशी मतदानाची टक्केवारी होती. येथील वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शिवसेनाविरोधी असलेले शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना झाला होता. या निवडणुकीत घाटाखालील तीनही मतदारसंघातील मतदानाच्या टक्क्यात ५ ते १० टक्के घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता आहे.

पिंपरी-चिंचवडचा वाढला टक्कापिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग १५ वर्षे सत्ता असलेले अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या चुरशीची लढत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मतदानाचा टक्का गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा वाढलेला आहे. त्याचा फायदा बारणे की पार्थ पवार यापैैकी कोणाला होणार याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळVotingमतदान