शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

एपीएमसीच्या विकासात नेमके हित कोणाचे?

By नारायण जाधव | Updated: November 7, 2022 06:50 IST

नवी मुंबईत सध्या सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत.

नवी मुंबईत सध्या सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली आल्यापासून तर हे पेव अधिकच वाढले आहे. अशातच आता नवी मुंबईतील एकदम प्राइम लोकेशन असलेल्या रस्ते, रेल्वे मार्गांजवळ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासावरून सध्या रण पेटले आहे. 

वास्तविक १९८२ मध्ये कांदा, बटाटा मार्केटची उभारणी सिडकोने केली. मात्र, नित्कृष्ट बांधकामामुळे २००५ पासून नवी मुंबई महापालिकेने या मार्केटच्या इमारतींना धोकादायक म्हणून घोषित करून तेथे व्यवसाय करणे धोक्याचे आहे, असे सांगितले. यातून मग भूखंडाचे श्रीखंड आणि चटईक्षेत्राचा मलिदा खाणाऱ्यांचा शिरकाव झाला. मग पुनर्बांधणीसाठी व्यापाऱ्यांसह संचालक मंडळाने वाढीव एफएसआयची मागणी केली. आता एपीएमसी संचालक मंडळाने बैठक घेऊन केवळ कांदा, बटाटा मार्केटच नव्हे तर भाजीपाला, अन्नधान्य आणि मसाला या पाचही बाजार पेठांचा पुनर्विकास एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसून ठरलेल्या स्क्रिप्टनुसार वापरा या तत्त्वावर हा पुनर्विकास करून त्याकरिता संचालक मंडळाने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला.

सल्लागारकडून पाचही बाजारपेठांचा बांधणी आराखडा तयार करून घेण्यात येणार असून, यामध्ये पुढील ५०-१०० वर्षांचा विचार करण्यात येणार आहे. यात सर्व सुविधा, पार्किंग व्यवस्था नियोजन केले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत सल्लागारांकडून हा आराखडा तयार करून त्यानंतर बाजार घटकांपुढे आराखडा ठेवून निर्णय घेण्यात येणार आहे. खरे तर आधी १९ एकर भूखंडावरील कांदा-बटाटा मार्केटचा पुनर्विकासाचा निर्णय झाला. यात आधी व्यापाऱ्यांना ६५० चौरस फुटांचे गाळे देण्यात येणार होते. आता अडीच एफएसआयनुसार ११०० फुटांचे गाळे देण्यात येतील, अशी चर्चा आहे. यात १६ एकरांवर मार्केट आणि तीन एकर जागा बिल्डरला देण्यात येणार आहे.

व्यापारी-कामगार अजूनही अंधारात १. शासनाने गेल्या वर्षी एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली जाहीर केल्यापासून भूखंडाचे आकारमान आणि ते कोणत्या रस्त्यालगत आहे, यानुसार तब्बल साडेसहा ते सात इतके चटईक्षेत्र प्रीमियम भरून घेता येणार आहे.२. एपीएमसीतील अवजड वाहनांची होणारी ये-जा लक्षात घेता सिडकोने मोठेमोठे रस्ते तयार केले आहेत. सानपाडा, तुर्भे ही रेल्वेस्थानके, वाशी-तुर्भे जोडरस्ता आणि पामबीच मार्गावर या बाजारपेठा आहेत. यामुळे येथे सहा ते सात इतके चटईक्षेत्र सहज मिळणार आहे. मात्र, यापासून व्यापारी आणि कामगारांना अंधारात ठेवले आहे.

आंतरराष्ट्रीय निविदा का नाही? बाजार समित्यांचा परिसर ६५ हेक्टर परिसरात विस्तारलेला आहे. तसेच येथील भूखंडांची किंमत आणि नव्या नियमानुसार मिळणारे चटईक्षेत्र पाहता या मार्केटच्या पुनर्विकासासाठी धारावीप्रमाणे आंतरराष्ट्रीय विकासकांकडून निविदा मागवून त्यांचा विकास करणे अभिप्रेत असताना चोरी चोरी, चुपके चुपकेचा खेळ कोण खेळत आहे, याची उत्तरे अनुत्तरित आहेत. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती