शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

एपीएमसीच्या विकासात नेमके हित कोणाचे?

By नारायण जाधव | Updated: November 7, 2022 06:50 IST

नवी मुंबईत सध्या सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत.

नवी मुंबईत सध्या सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली आल्यापासून तर हे पेव अधिकच वाढले आहे. अशातच आता नवी मुंबईतील एकदम प्राइम लोकेशन असलेल्या रस्ते, रेल्वे मार्गांजवळ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासावरून सध्या रण पेटले आहे. 

वास्तविक १९८२ मध्ये कांदा, बटाटा मार्केटची उभारणी सिडकोने केली. मात्र, नित्कृष्ट बांधकामामुळे २००५ पासून नवी मुंबई महापालिकेने या मार्केटच्या इमारतींना धोकादायक म्हणून घोषित करून तेथे व्यवसाय करणे धोक्याचे आहे, असे सांगितले. यातून मग भूखंडाचे श्रीखंड आणि चटईक्षेत्राचा मलिदा खाणाऱ्यांचा शिरकाव झाला. मग पुनर्बांधणीसाठी व्यापाऱ्यांसह संचालक मंडळाने वाढीव एफएसआयची मागणी केली. आता एपीएमसी संचालक मंडळाने बैठक घेऊन केवळ कांदा, बटाटा मार्केटच नव्हे तर भाजीपाला, अन्नधान्य आणि मसाला या पाचही बाजार पेठांचा पुनर्विकास एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसून ठरलेल्या स्क्रिप्टनुसार वापरा या तत्त्वावर हा पुनर्विकास करून त्याकरिता संचालक मंडळाने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला.

सल्लागारकडून पाचही बाजारपेठांचा बांधणी आराखडा तयार करून घेण्यात येणार असून, यामध्ये पुढील ५०-१०० वर्षांचा विचार करण्यात येणार आहे. यात सर्व सुविधा, पार्किंग व्यवस्था नियोजन केले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत सल्लागारांकडून हा आराखडा तयार करून त्यानंतर बाजार घटकांपुढे आराखडा ठेवून निर्णय घेण्यात येणार आहे. खरे तर आधी १९ एकर भूखंडावरील कांदा-बटाटा मार्केटचा पुनर्विकासाचा निर्णय झाला. यात आधी व्यापाऱ्यांना ६५० चौरस फुटांचे गाळे देण्यात येणार होते. आता अडीच एफएसआयनुसार ११०० फुटांचे गाळे देण्यात येतील, अशी चर्चा आहे. यात १६ एकरांवर मार्केट आणि तीन एकर जागा बिल्डरला देण्यात येणार आहे.

व्यापारी-कामगार अजूनही अंधारात १. शासनाने गेल्या वर्षी एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली जाहीर केल्यापासून भूखंडाचे आकारमान आणि ते कोणत्या रस्त्यालगत आहे, यानुसार तब्बल साडेसहा ते सात इतके चटईक्षेत्र प्रीमियम भरून घेता येणार आहे.२. एपीएमसीतील अवजड वाहनांची होणारी ये-जा लक्षात घेता सिडकोने मोठेमोठे रस्ते तयार केले आहेत. सानपाडा, तुर्भे ही रेल्वेस्थानके, वाशी-तुर्भे जोडरस्ता आणि पामबीच मार्गावर या बाजारपेठा आहेत. यामुळे येथे सहा ते सात इतके चटईक्षेत्र सहज मिळणार आहे. मात्र, यापासून व्यापारी आणि कामगारांना अंधारात ठेवले आहे.

आंतरराष्ट्रीय निविदा का नाही? बाजार समित्यांचा परिसर ६५ हेक्टर परिसरात विस्तारलेला आहे. तसेच येथील भूखंडांची किंमत आणि नव्या नियमानुसार मिळणारे चटईक्षेत्र पाहता या मार्केटच्या पुनर्विकासासाठी धारावीप्रमाणे आंतरराष्ट्रीय विकासकांकडून निविदा मागवून त्यांचा विकास करणे अभिप्रेत असताना चोरी चोरी, चुपके चुपकेचा खेळ कोण खेळत आहे, याची उत्तरे अनुत्तरित आहेत. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती