शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

आमची उद्याने काेणी पळविली, परत द्या!

By नारायण जाधव | Updated: June 19, 2023 11:33 IST

गेल्या वर्षी तर शहराने देशात तिसरा क्रमांक मिळविला होता. ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही सातत्याने डंका वाजवला आहे.

भारतातील सर्वांत मोठे सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. शहर स्वच्छतेत नवी मुंबई महापालिकेने सलग महाराष्ट्रात पहिला आणि देशात पहिल्या दहामध्ये क्रमांक मिळविला आहे. गेल्या वर्षी तर शहराने देशात तिसरा क्रमांक मिळविला होता. ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही सातत्याने डंका वाजवला आहे. अशा सर्वांगसुंदर-स्वच्छ शहराच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्यानाचा एक भूखंड एमआयडीसीने उद्योगासाठी दिल्याने स्थानिक रहिवासी पेटून उठले आहेत. यानिमित्ताने उद्याने आणि मैदानांचा विषय ऐरणीवर आला आहे.

महापालिकेचे विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहराचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्याचा विडा उचलून त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरांतील उद्यानांची विषमता चव्हाट्यावर आली आहे. १८ ते साडेअठरा लाखांवर लोकसंख्या असलेल्या या शहरातील सुमारे १८ ते १९ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. मात्र, त्यांच्यासाठी अवघे एकच उद्यान आहे. शहराचे मूळ रहिवासी असलेल्या गावठाणांचीही अशीच अवस्था आहे. सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महापालिकेच्या विकास आराखड्यातही गावठाणे आणि झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक सुविधांचा विचार केलेला दिसत नाही. मग सुनियोजित शहरांतील गावठाणे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब नागरिकांना उद्यानात हिंडण्या-बागडण्याचा अधिकार नाही का, अशाने शहराचा हॅपिनेस इंडेक्स कसा वाढेल, असे प्रश्न विचारावेसे वाटत आहेत.

नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरातील औद्याेगिक पट्ट्यात आणि वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. शिवाय जुनी गावठाणे आहेतच. शहराची जन्मदाती सिडकोसह एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेनेही शहरातील गावठाणे आणि झोपडपट्ट्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. वॉटर, मीटर आणि गटर या सुविधा दिल्या म्हणजे नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी संपली, असे नाही. एका अभ्यासानुसार २०११ मध्ये शहरात ४७ झोपडपट्ट्या होत्या. त्यातील तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, गणपतीपाडा-वारलीपाडा आणि हनुमाननगर या ४ झोपडपट्ट्या राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनीवर, तर उर्वरित एमआयडीसीसह सिडकोच्या जमिनीवर आहेत. २०२२ च्या युवा-जीएचएसएस सर्वेक्षणात ही संख्या वाढली असून ७६ झोपडपट्ट्यांवर गेली आहे. आता महापालिकेने २०२२ मध्ये तयार केलेल्या विकास आराखड्यातही गावठाणे आणि झोपडपट्ट्यांचा विचार केलेला नाही. झोपडपट्ट्याच नव्हे, तर मूळ २९ गावठाणांच्या विकासासह तेथील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे.

तीन तिघाडे आणि काम बिघाडे  नवी मुंबईत सिडको, महापालिका आणि एमआयडीसी अशी तीन प्राधिकरणे आहेत. त्यांच्यात विकास आणि नियोजनाच्या हक्कांवरून वाद आहेत. मात्र, या वादात शहरवासीय भरडले जात आहेत; परंतु यावर भांडायला, त्यांच्या मानवी हक्कांवर गदा आणणाऱ्या या प्राधिकरणांना जाब विचारण्याची हिंमत एकही लोकप्रतिनिधी दाखवित नाही, हे खरे दु:ख आहे.

    नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत हल्ली जी १५७ उद्याने आहेत त्यातील ९८ उद्याने बेलापूर, नेरूळ व वाशी या तीन विभागांतच आहेत.     उर्वरित पाच विभागांत फक्त ५९ उद्याने आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये दिघा येथे एकमेव उद्यान आहे.     केवळ झोपडपट्टी विभागाच नाही तर शहरातील मूळ २९ गावठाणांची अनियंत्रित अशी वाढ झाली आहे. अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांनी त्यांना वेढले आहे. त्या ठिकाणीही उद्याने, मैदाने, रुग्णालयांची वानवा आहे.     सार्वजनिक सुविधांसाठी मोकळ्या जागाच शिल्लक नसल्याने येथे राहणाऱ्या लोकसंख्येच्या हॅपिनेस इंडेक्सचे काय? त्याचे उत्तर कोण देणार?

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई