शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:18 IST

पनवेल तालुक्यातील स्थिती

ठळक मुद्देकोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब आणि गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मयूर तांबडेलोकमत न्यूज नेटवर्क नवीन पनवेल :  अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू  असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत झाले आहे; मात्र अद्याप अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, धान्याचे वाटप लवकर करा, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब आणि गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू केलेत. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. ही घोषणा करून जवळपास महिना होत आला तरी पनवेल तालुक्यात अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. 

पनवेलमध्ये एकूण १९३ रेशन धान्याची दुकाने आहेत. दरम्यान, मे महिन्यासाठी वाटप होणारे धान्य हेच मोफतचे धान्य असेल, अशी शक्यता आहे. याचवेळी केंद्र शासनाकडूनदेखील मोफत धान्य वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजनेतून मे व जून अशा दोन महिन्यांसाठी पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गोरगरीब रेशनच्या धान्यावर अवलंबून असलेल्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे; मात्र केंद्राकडूनदेखील मोफत धान्य वाटपासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन धान्य वाटप करावे, तसेच राज्य शासनाने घोषणा केलेले धान्यदेखील लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे. - सुधीर आंबेकर 

हाताला काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केली; मात्र धान्याचे वाटप अद्याप रेशन दुकानातून झालेले नाही. मोफत धान्य तत्काळ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन किती दिवस आहे, यासंदर्भात काहीच माहिती नाही.- रवींद्र पाटील

गेल्या वर्षापासून काम मिळणेदेखील कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षीदेखील दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे धान्याचे वाटप तत्काळ करावे.- विकास खारुटकर 

१० मे पर्यंत पनवेल तालुक्यातील सर्व दुकानांत धान्य पोहोचणार आहे. सध्या ४० रेशन दुकानांत धान्य पोच झाले आहे. - स्मिता जाधव, पुरवठा अधिकारी- पनवेल

कार्डधारकअंत्योदय     ६०९४ बीपीएल आणि केशरी (प्राधान्य योजना )     ६२३६० लोकसंख्या     २,५६,२५५

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई