शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

ऐरोली क्षेत्रातील वीज समस्या कधी सुटणार?; रहिवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:45 IST

१५ वर्षे प्रश्न रखडला गाव, गावठाण, झोपडपट्टी परिसरात अडचणी

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेषत: गाव, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात वीज समस्या गंभीर बनली आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे असल्याने या क्षेत्रातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.विधानसभेच्या ऐरोली मतदार संघात सर्वाधिक झोपड्या आहेत. तसेच या विभागातील मूळ गावांत गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारली आहेत. त्यामुळे गावांतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वीज व पाणी या मूलभूत गरजा असल्याने मागेल त्याला या सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचा परिणाम म्हणून बेकायदा इमारती, झोपड्या, भंगाराची गोदामे व इतर लघुउद्योगांना विजेचा मागणी तसा पुरवठा करण्यात येत आहे. मागील पंधरा वर्षांत या क्षेत्रात विजेची मागणी वाढली आहे; परंतु वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणा जुन्याच आहेत. आजही अनेक भागात डोक्यावर लोंबकळणाºया विद्युत केबल्स पाहावयास मिळतात. भूमिगत विद्युत केबल्सचा केवळ अर्थपूर्ण फार्स ठरला आहे. डीपी बॉक्सचे केवळ सांगाडे उरले आहेत. ऐरोली, रबाळे, गोठीवली व घणसोली विभागात वीज समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून येते. या विभागात अखंडित वीज पुरवठा ही बाब स्वप्नवत झाली आहे. दिवसभरातून एकदा तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत केबल्सला आग लागणे, डीपी बॉक्समध्ये बिघाड या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात ऐन परीक्षेच्या काळात या विभागातील विद्युत पुरवठा तब्बल १७ तास खंडित राहिला. विशेष म्हणजे मागील तीन चार महिन्यात या विभागात विद्युत केबल्सला आग लागण्याच्या पंधरा ते वीस घटना घडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा संताप पसरला आहे. पंधरा वर्षांपासून या विभागातील विजेचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा प्रचाराच्या अग्रभागी राहिला आहे. डीपी बॉक्सची दुरुस्ती, अपुºया विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या वेळोवेळी घोषणा करण्यात आल्या; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही काहीच झाली नाही.

टॅग्स :electricityवीज