शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

शाळाबाह्यमुलांचा प्रवेशाचा श्रीगणेशा कधी?

By admin | Updated: September 22, 2015 03:38 IST

संपूर्ण राज्यासह कल्याण तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १७२ मुले आढळून आली.

बिर्लागेट : संपूर्ण राज्यासह कल्याण तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १७२ मुले आढळून आली. यापैकी तब्बल १२३ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. परंतु यातूनही ४३ मुलांचे स्थलांतर झाल्याने अद्यापही ६ मुलांना शाळेत दाखल न केल्याने आल्याने या मुलांचा शाळा प्रवेशाचा श्रीगणेशा कधी होणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.विटभट्टी मजूर, ऊसतोड कामगार, झोपडपट्टी कामगार, दगडखाणी मजूर आदी असंघटीत लोकांच्या मुलांना शिक्षणाचा मुलभूत हक्क मिळाळा त्यांची मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलै रोजी सर्वच शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत हे सर्व्हेक्षण करण्यात आले. याकरीता महापालिका, जिल्हा, तालुका, गाव स्तरांवर समन्वयासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या. सुमारे १०० घरांसाठी एक सर्व्हेक्षण अधिकारी, २० सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांवर १ झोनल २० झोनल अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक अशी रचना करण्यात आली. त्यानुसार कल्याण तालुक्यात ४०० शिक्षक, २६ मुख्याध्यापक, ८ केंद्रमुख, ३ शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बीडीओ यांच्यासह २०२० अंगणवाडी कार्यकर्त्या आणि १०० व्या आसपास खाजगी शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याने कल्याण तालुक्यात शाळा बाह्य मुले शोधण्यात आली यामध्ये १७२ मुले सापडली.खोणी केंद्रात ८, गुरवली १०, म्हारळ २०, गोवेली २, खडवली ७, मामणोली १२, सोनारपाडा ८८ आणि दहिसर २५ अशी एकूण १७२ शाळाब्ह्य मुलांपैकी १२३ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले तर खोणी २, गुरवली १, गोवेली १, सोनारपाडा १ आणि दहीसर १ अशी ६ मुले अद्याप शाळेच्या बाहेरच आहेत.तर सापडलेल्या मुलांपैकी ४३ मुलांनी पुन्हा स्थलांतर केले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये खोणी केंद्रात ३, म्हारळ १३, सोनारपाडा १२ आणि दहिसर १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत विविध स्तरांवर शाळाबाह्य मुलांची गणना झाली. स्वयंसेवी संस्था, सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व्हेक्षण झाले. मात्र शाळाबाह्य मुलांची ठोस आकडेवारी राज्याकडे नाही. कोणत्याही बाह्य यंत्रणेकडून २००५ नंतर सर्व्हेक्षण झाले नाही. २०१३-१४ मध्ये शाळाबाह्य मुलांची संख्याकेवळ ३७ हजार ८२४ इतकी असल्याचे सांगण्यात आले. मात्र शाळेचा पट वाचविण्यासाठी, उपस्थिती आता, पोषण आहाराचे अनुदान घेण्यासाठी पट फुगविला जातो. परिणामी शाळाबाह्यमुलांची संख्या कमी आढळते. प्रत्यक्षात ही संख्या ८ ते ९ लाखांच्या घरात असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. अशीच परिस्थिती कल्याणमध्येही आहे. कारण प्रत्येक घर, गजबजलेल्या वस्त्या, झोपडपट्ट्या, बसस्थानके, रेल्वेस्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजार, खेडेगाव, वाडी, पाडे, तांडे, शेततळे, जंगल, गुन्हातगर, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, भीक मागणारी मुले तमाशा कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा, भटक्या जमाती अशा असंख्य ठिकाणी आजही शाळाबाह्य मुले सापडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा शाळाबाहेरील मुलांचा शाळा प्रवेशाचा श्रीगणेशा केव्हा होणार असे पालक विचारीत आहेत.