शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्यमुलांचा प्रवेशाचा श्रीगणेशा कधी?

By admin | Updated: September 22, 2015 03:38 IST

संपूर्ण राज्यासह कल्याण तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १७२ मुले आढळून आली.

बिर्लागेट : संपूर्ण राज्यासह कल्याण तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १७२ मुले आढळून आली. यापैकी तब्बल १२३ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. परंतु यातूनही ४३ मुलांचे स्थलांतर झाल्याने अद्यापही ६ मुलांना शाळेत दाखल न केल्याने आल्याने या मुलांचा शाळा प्रवेशाचा श्रीगणेशा कधी होणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.विटभट्टी मजूर, ऊसतोड कामगार, झोपडपट्टी कामगार, दगडखाणी मजूर आदी असंघटीत लोकांच्या मुलांना शिक्षणाचा मुलभूत हक्क मिळाळा त्यांची मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलै रोजी सर्वच शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत हे सर्व्हेक्षण करण्यात आले. याकरीता महापालिका, जिल्हा, तालुका, गाव स्तरांवर समन्वयासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या. सुमारे १०० घरांसाठी एक सर्व्हेक्षण अधिकारी, २० सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांवर १ झोनल २० झोनल अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक अशी रचना करण्यात आली. त्यानुसार कल्याण तालुक्यात ४०० शिक्षक, २६ मुख्याध्यापक, ८ केंद्रमुख, ३ शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बीडीओ यांच्यासह २०२० अंगणवाडी कार्यकर्त्या आणि १०० व्या आसपास खाजगी शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याने कल्याण तालुक्यात शाळा बाह्य मुले शोधण्यात आली यामध्ये १७२ मुले सापडली.खोणी केंद्रात ८, गुरवली १०, म्हारळ २०, गोवेली २, खडवली ७, मामणोली १२, सोनारपाडा ८८ आणि दहिसर २५ अशी एकूण १७२ शाळाब्ह्य मुलांपैकी १२३ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले तर खोणी २, गुरवली १, गोवेली १, सोनारपाडा १ आणि दहीसर १ अशी ६ मुले अद्याप शाळेच्या बाहेरच आहेत.तर सापडलेल्या मुलांपैकी ४३ मुलांनी पुन्हा स्थलांतर केले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये खोणी केंद्रात ३, म्हारळ १३, सोनारपाडा १२ आणि दहिसर १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत विविध स्तरांवर शाळाबाह्य मुलांची गणना झाली. स्वयंसेवी संस्था, सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व्हेक्षण झाले. मात्र शाळाबाह्य मुलांची ठोस आकडेवारी राज्याकडे नाही. कोणत्याही बाह्य यंत्रणेकडून २००५ नंतर सर्व्हेक्षण झाले नाही. २०१३-१४ मध्ये शाळाबाह्य मुलांची संख्याकेवळ ३७ हजार ८२४ इतकी असल्याचे सांगण्यात आले. मात्र शाळेचा पट वाचविण्यासाठी, उपस्थिती आता, पोषण आहाराचे अनुदान घेण्यासाठी पट फुगविला जातो. परिणामी शाळाबाह्यमुलांची संख्या कमी आढळते. प्रत्यक्षात ही संख्या ८ ते ९ लाखांच्या घरात असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. अशीच परिस्थिती कल्याणमध्येही आहे. कारण प्रत्येक घर, गजबजलेल्या वस्त्या, झोपडपट्ट्या, बसस्थानके, रेल्वेस्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजार, खेडेगाव, वाडी, पाडे, तांडे, शेततळे, जंगल, गुन्हातगर, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, भीक मागणारी मुले तमाशा कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा, भटक्या जमाती अशा असंख्य ठिकाणी आजही शाळाबाह्य मुले सापडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा शाळाबाहेरील मुलांचा शाळा प्रवेशाचा श्रीगणेशा केव्हा होणार असे पालक विचारीत आहेत.