शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:27 IST

स्थायी समितीमध्ये आज होणार सादर : गतवर्षीच्या महत्त्वाकांक्षी घोषणा कागदावरच; निवडणुकीमुळे अर्थसंकल्पाला आले महत्त्व

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२० - २१ साठीचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीमध्ये सादर होणार आहे. गतवर्षी ४०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली होती. हे उद्दिष्ट पूर्ण झाले का? हा उत्सुकतेचा विषय आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे या वर्षी अर्थसंकल्पामध्ये नक्की काय घोषणा होणार व गतवर्षीपेक्षा वाढीव उद्दिष्ट दिले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना जानेवारी १९९२ मध्ये झाली. तीन दशकांच्या वाटचालीमध्ये महापालिकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका म्हणून नावलौकिक मिळविला आहे. १९९५ मध्ये ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. प्रत्यक्षात वर्षभरामध्ये १८ कोटी ५८ लाख रुपयेच महसूल जमा झाला होता. यानंतर प्रशासनाने परिश्रम करून उत्पन्नाचा आलेख वाढवत नेला. गतवर्षी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी ३४५५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने त्यामध्ये ११५ कोटी रुपयांची व महासभेने १३९ कोटी रुपयांची वाढ करून तब्बल ४०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती.विक्रमी अर्थसंकल्प असल्यामुळे वर्षभरामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात एकही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होऊ शकली नाही. रस्ते, गटार, पदपथ व इतर कामांवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली. महापालिकेची सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाहीत.पातळगंगा नदीचे पाणी विकत घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही मार्गी लागू शकलेला नाही. भुयारी मार्ग, उड्डाणपूल व इतर योजनाही कागदावरच राहिल्या आहेत.

महापालिकेचा २०२० - २१ साठीचा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ स्थायी समितीमध्ये सादर करणार आहेत. मिसाळ यांचा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. या पंचवार्षिक कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य झाले का? व पुढील वर्षासाठी नक्की काय योजना अर्थसंकल्पात असणार आहेत? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहरवासीयांना आकर्षित करणाऱ्या योजनांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.महापालिकेने गतवर्षी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली होती. या अभय योजनेमुळे महसूलामध्ये नक्की किती वाढ झाली? पुढील वर्षासाठी अजून किती वाढ होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.वर्षभरात पूर्ण नझालेल्या योजनाच्२८२ कोटी रुपये खर्च करून पातळगंगा नदीचे पाणी नवी मुंबईपर्यंत घेऊन येणेच्जुईनगर रेल्वे क्रॉसिंगजवळउड्डाणपूल बांधणेच्ठाणे-बेलापूर रोडवर, पामबीच व घणसोली ते ऐरोलीदरम्यान उड्डाणपूल बांधणेच्वंडर्स पार्कमधील साडेआठ एकरजमिनीवर सायन्स पार्कची उभारणीच्वाशीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचातरण तलाव बांधणेच्महापालिकेचे नेरूळ, सीबीडी व ऐरोली रुग्णालय पूर्ण क्षमतेने पूर्ण करणेप्रशासनाची कसरतच्आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये वाढ होत असते. गतवर्षी या वाढीचा विक्रम झाला होता.च्स्थायी समितीने ११५ व महासभेने १३९ अशी तब्बल ५६३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. यामुळे वाढीव उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाला वर्षभर कसरत करावी लागली असून किती उद्दिष्ट साध्य होणार हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.या वर्षीही करवाढ नाहीच्नवी मुंबई महानगरपालिकेने २००५ पासून कोणतीही करवाढ केलेली नाही.च्शहरवासीयांवर कराचा बोजा न टाकण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.च्२०२० - २१ या वर्षासाठीही कोणतीही करवाढ केली जाणार नाही. करवाढ करायची असल्यास अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कराच्या रचनेला स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते.च्अद्याप ती परवानगी घेतलेली नसल्यामुळे करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई