शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:46 IST

शहराबाहेरील फेरीवाल्यांचा शिरकाव; महापालिकेकडून कारवाईची औपचारिकता

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : आठवडे बाजारावरून सध्या शहरातील राजकारण पेटले आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांच्यात या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपा आठवडे बाजार बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. तर आठवडे बाजाराला आपला आक्षेप नसून, बाहेरून येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्यांना आपला विरोध असल्याची भूमिका मंदा म्हात्रे यांनी मांडली आहे. हीच भूमिका आपण दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.मुळात शहरातील आठवडे बाजार बंद करण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. कारण, या आठवडे बाजारात स्थानिकापेक्षा मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, कुर्ला आणि मुंब्रा येथून आलेल्या फेरीवाल्यांचा अधिक भरणा असतो. विशेष म्हणजे, यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणून आठवडे बाजारात पाकीटमारी, चेनस्नॅचिंग, मारामारी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्याशिवाय आठवडे बाजाराच्या दिवशी स्थानिक रहिवासी नाहक वेठीस धरले जातात. वाहतुकीचा उडणारा बोजवारा ही तर वेगळीच समस्या आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सायबर सिटीच्या गावागावांत भरणारे आठवडे बाजार बंद करावेत, अशी जुनी मागणी आहे. महापालिकेच्या सभागृहात गळा काढून ओरडणारे लोकप्रतिनिधी आपल्या विभागातील आठवडे बाजाराविषयी मात्र अर्थपूर्ण चुप्पी साधताना दिसत आहेत.विशेष म्हणजे, या आठवडे बाजारामागे मोठे ‘अर्थ’कारण दडले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या आश्रयाशिवाय हे बाजार भरणार नाहीत, कारण अनेक ठिकाणी नगरसेवकांचे बगलबच्चेच फेरीवाल्यांकडून हफ्ते वसूल करताना दिसतात. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांच्या अर्थपूर्ण युतीमुळेच आठवडे बाजाराचे भूत मानगुटीवर बसले आहे.महापालिकेकडून केवळ कारवाईचा फार्स रचला जातो. थातूरमातूर कारवाई करून, वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाला घाबरून अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी बोलावलेल्या व्यापाºयांच्या बैठकीत आठवडे बाजाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या आठवडे बाजारात स्थानिक फेरीवाल्यांना वाव मिळत नसेल, तर या संदर्भात ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे, तर भाजपा नवी मुंबईतील आठवडे बाजार बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपशहरप्रमुख व कामगारनेते प्रफुल्ल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे आठवडे बाजारच्या मुद्द्यावरून येत्या काळात शिवसेना आणि भाजपात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आठवडे बाजाराचा सर्वाधिक फटका स्थानिक रहिवाशांना बसतो. यासंदर्भात त्या त्या ठिकाणच्या रहिवाशांनी महापालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ठिकठिकाणी आठवडे बाजार भरविले जाऊ नयेत, अशा आशयाचे फलक लावले आहेत; परंतु त्यानंतरसुद्धा हे बाजार भरत आहेत.घणसोलीत गंभीर अवस्थाघणसोलीमधील स्थिती सर्वात गंभीर आहे. प्रत्येक रविवारी नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालयासमोरील रस्ता, दगडू पाटील चौक, स्वातंत्र्य सैनिक चौक, डी-मार्ट परिसर, सद्गुुरू हॉस्पिटल रोड, साई सदानंद नगर परिसरामध्ये शेकडो फेरीवाले जागा अडवत आहेत. महापालिकेच्या कारवाईला घाबरून काही फेरीवाले रस्त्यालगत असलेल्या संबंधित जागामालकाचा शोध घेतात, त्यामुळे जागेचे मालक प्रत्येक रविवारी जागा उपलब्ध करून भाडे घेतात आणि प्रत्येकी १०० रु पये भुईभाडे आकारले जाते. घणसोलीप्रमाणेच कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, तुर्भे, बेलापूर आदी भागांत नियमित आठवडे बाजार भरत आहे.माजी आयुक्तांनी केली होती कारवाईमहापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आठवडे बाजारावर कारवाईचा आसूड उगारला होता. विभाग अधिकाºयांना सक्त ताकीद दिली होती, त्यामुळे आठवडे बाजाराला काही प्रमाणात आळा बसला होता; परंतु त्यांची बदली होताच, पुढच्याच आठवड्यात हे बाजार पुन्हा भरू लागले आहेत.

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई