शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:46 IST

शहराबाहेरील फेरीवाल्यांचा शिरकाव; महापालिकेकडून कारवाईची औपचारिकता

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : आठवडे बाजारावरून सध्या शहरातील राजकारण पेटले आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांच्यात या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपा आठवडे बाजार बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. तर आठवडे बाजाराला आपला आक्षेप नसून, बाहेरून येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्यांना आपला विरोध असल्याची भूमिका मंदा म्हात्रे यांनी मांडली आहे. हीच भूमिका आपण दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.मुळात शहरातील आठवडे बाजार बंद करण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. कारण, या आठवडे बाजारात स्थानिकापेक्षा मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, कुर्ला आणि मुंब्रा येथून आलेल्या फेरीवाल्यांचा अधिक भरणा असतो. विशेष म्हणजे, यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणून आठवडे बाजारात पाकीटमारी, चेनस्नॅचिंग, मारामारी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्याशिवाय आठवडे बाजाराच्या दिवशी स्थानिक रहिवासी नाहक वेठीस धरले जातात. वाहतुकीचा उडणारा बोजवारा ही तर वेगळीच समस्या आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सायबर सिटीच्या गावागावांत भरणारे आठवडे बाजार बंद करावेत, अशी जुनी मागणी आहे. महापालिकेच्या सभागृहात गळा काढून ओरडणारे लोकप्रतिनिधी आपल्या विभागातील आठवडे बाजाराविषयी मात्र अर्थपूर्ण चुप्पी साधताना दिसत आहेत.विशेष म्हणजे, या आठवडे बाजारामागे मोठे ‘अर्थ’कारण दडले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या आश्रयाशिवाय हे बाजार भरणार नाहीत, कारण अनेक ठिकाणी नगरसेवकांचे बगलबच्चेच फेरीवाल्यांकडून हफ्ते वसूल करताना दिसतात. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांच्या अर्थपूर्ण युतीमुळेच आठवडे बाजाराचे भूत मानगुटीवर बसले आहे.महापालिकेकडून केवळ कारवाईचा फार्स रचला जातो. थातूरमातूर कारवाई करून, वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाला घाबरून अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी बोलावलेल्या व्यापाºयांच्या बैठकीत आठवडे बाजाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या आठवडे बाजारात स्थानिक फेरीवाल्यांना वाव मिळत नसेल, तर या संदर्भात ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे, तर भाजपा नवी मुंबईतील आठवडे बाजार बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपशहरप्रमुख व कामगारनेते प्रफुल्ल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे आठवडे बाजारच्या मुद्द्यावरून येत्या काळात शिवसेना आणि भाजपात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आठवडे बाजाराचा सर्वाधिक फटका स्थानिक रहिवाशांना बसतो. यासंदर्भात त्या त्या ठिकाणच्या रहिवाशांनी महापालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने ठिकठिकाणी आठवडे बाजार भरविले जाऊ नयेत, अशा आशयाचे फलक लावले आहेत; परंतु त्यानंतरसुद्धा हे बाजार भरत आहेत.घणसोलीत गंभीर अवस्थाघणसोलीमधील स्थिती सर्वात गंभीर आहे. प्रत्येक रविवारी नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालयासमोरील रस्ता, दगडू पाटील चौक, स्वातंत्र्य सैनिक चौक, डी-मार्ट परिसर, सद्गुुरू हॉस्पिटल रोड, साई सदानंद नगर परिसरामध्ये शेकडो फेरीवाले जागा अडवत आहेत. महापालिकेच्या कारवाईला घाबरून काही फेरीवाले रस्त्यालगत असलेल्या संबंधित जागामालकाचा शोध घेतात, त्यामुळे जागेचे मालक प्रत्येक रविवारी जागा उपलब्ध करून भाडे घेतात आणि प्रत्येकी १०० रु पये भुईभाडे आकारले जाते. घणसोलीप्रमाणेच कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, तुर्भे, बेलापूर आदी भागांत नियमित आठवडे बाजार भरत आहे.माजी आयुक्तांनी केली होती कारवाईमहापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आठवडे बाजारावर कारवाईचा आसूड उगारला होता. विभाग अधिकाºयांना सक्त ताकीद दिली होती, त्यामुळे आठवडे बाजाराला काही प्रमाणात आळा बसला होता; परंतु त्यांची बदली होताच, पुढच्याच आठवड्यात हे बाजार पुन्हा भरू लागले आहेत.

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई