शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करू

By admin | Updated: July 24, 2015 03:02 IST

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी

नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुरक्षित नवी मुंबईकर हेच आमचे ध्येय आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून गुन्हे शाखेच्या बळकटीकरणासह हद्दवाढीसाठी पावले उचलली जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी दिली. नवी मुंबईच्या सुरक्षिततेविषयी पोलिसांची भूमिका व गुन्हे नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याविषयी त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ कार्यक्रमांतर्गत मनमोकळ्या गप्पा मारल्या. वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्ह्यांचे प्रमाण व स्वरूप बदलत आहे. सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड, ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणे या गुन्ह्यांवर गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. राज्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण चांगले आहे. भविष्यात पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हे प्रकटीकरण व ते सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येईल. गुन्हे शाखेचे बळकटीकरण करण्यात येईल. शहरात अनेक महत्त्वाचे उद्योग आहेत. त्यामुळे घातपाती कारवाई होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही रंजन त्यांनी स्पष्ट केले. सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहे. आयुक्तालय क्षेत्रातील सायबर सेल तज्ज्ञांच्या मदतीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या विभागात अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश करण्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. चोरीच्या घटना वारंवार घडतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याआधारे अनेक चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. वाढत्या उद्योगांमुळे आर्थिक गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा गुन्ह्यांमध्ये योग्य सहकार्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.