शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करू

By admin | Updated: July 24, 2015 03:02 IST

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी

नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुरक्षित नवी मुंबईकर हेच आमचे ध्येय आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून गुन्हे शाखेच्या बळकटीकरणासह हद्दवाढीसाठी पावले उचलली जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी दिली. नवी मुंबईच्या सुरक्षिततेविषयी पोलिसांची भूमिका व गुन्हे नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याविषयी त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ कार्यक्रमांतर्गत मनमोकळ्या गप्पा मारल्या. वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्ह्यांचे प्रमाण व स्वरूप बदलत आहे. सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड, ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणे या गुन्ह्यांवर गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. राज्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण चांगले आहे. भविष्यात पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हे प्रकटीकरण व ते सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येईल. गुन्हे शाखेचे बळकटीकरण करण्यात येईल. शहरात अनेक महत्त्वाचे उद्योग आहेत. त्यामुळे घातपाती कारवाई होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही रंजन त्यांनी स्पष्ट केले. सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहे. आयुक्तालय क्षेत्रातील सायबर सेल तज्ज्ञांच्या मदतीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या विभागात अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश करण्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. चोरीच्या घटना वारंवार घडतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याआधारे अनेक चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. वाढत्या उद्योगांमुळे आर्थिक गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा गुन्ह्यांमध्ये योग्य सहकार्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.