शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करू

By admin | Updated: July 24, 2015 03:02 IST

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी

नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नवी मुंबईला कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुरक्षित नवी मुंबईकर हेच आमचे ध्येय आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून गुन्हे शाखेच्या बळकटीकरणासह हद्दवाढीसाठी पावले उचलली जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी दिली. नवी मुंबईच्या सुरक्षिततेविषयी पोलिसांची भूमिका व गुन्हे नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याविषयी त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ कार्यक्रमांतर्गत मनमोकळ्या गप्पा मारल्या. वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्ह्यांचे प्रमाण व स्वरूप बदलत आहे. सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड, ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणे या गुन्ह्यांवर गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. राज्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण चांगले आहे. भविष्यात पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हे प्रकटीकरण व ते सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येईल. गुन्हे शाखेचे बळकटीकरण करण्यात येईल. शहरात अनेक महत्त्वाचे उद्योग आहेत. त्यामुळे घातपाती कारवाई होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही रंजन त्यांनी स्पष्ट केले. सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहे. आयुक्तालय क्षेत्रातील सायबर सेल तज्ज्ञांच्या मदतीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या विभागात अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश करण्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. चोरीच्या घटना वारंवार घडतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याआधारे अनेक चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. वाढत्या उद्योगांमुळे आर्थिक गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा गुन्ह्यांमध्ये योग्य सहकार्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.