शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

 ...अन्यथा महापालिका मुख्यालयाला घेराव घालू; जनतेच्या प्रश्नांवरून गणेश नाईक कडाडले

By कमलाकर कांबळे | Updated: October 19, 2023 19:51 IST

समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याची बाब नाईक यांनी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. 

नवी मुंबई : महापालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे होत नाहीत. प्रस्तावित असलेली अनेक कामे जनतेच्या हिताच्या विरोधात आहेत. हा प्रकार थांबला नाही तर महापालिका मुख्यालयाला घेराव घालू, असा इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गणेश नाईक यांनी गुरूवारी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या मागणीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सिडको आणि एमआयडीसीकडून महापालिकेने सुविधा भूखंड प्राप्त करून घेण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याची बाब नाईक यांनी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. 

तसेच एमआयडीसीने सर्व्हिस रोडच्या कडेला चुकीच्या पद्धतीने भूखंडांचे वाटप केले आहे. ते तत्काळ रद्द करून करण्याची मागणी त्यांनी केली. पाणीपुरवठा करण्याबाबत राजकारण होत असल्याबद्दल नाईक यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. काही घटकांच्या दहशतीखाली कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पाण्याचे राजकारण चालू देणार नाही. सर्वांना पाणी मिळालेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. घणसोली येथील फोर्टी प्लसचे मैदान खेळासाठीच राहिले पाहिजे. बिल्डरच्या घशात ते घालू देणार नाही, असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेने नर्सरी ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय सुरु करण्याची मागणी केली. मराठी, हिंदी विषय सक्तीचे करून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे. अमर्याद इमारती बांधून नवी मुंबईचा कोंडवाडा करू नका. त्यामुळे नवी मुंबईतील सुविधांवर ताण निर्माण होईल. नवी मुंबईतील नागरिकांना त्रासात टाकू देणार नाही, मोरबे धरणाच्या जलवाहिनीवरून नवी मुंबईबाहेर पाणीपुरवठा करण्यासाठी बेकायदा जलवाहिनी टाकण्याचा घाट घालण्यात आला आहे. ही गंभीर बाब असून, या प्रकारची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास जनतेच्या हितासाठी महापालिकेला घेराव घातला जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला आहे.

याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, संपत शेवाळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक