शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आम्हाला थ्री जी, फोरजी नको, केवळ पाणी आणि वीज द्या; आदिवासी बांधवांची खदखद

By वैभव गायकर | Updated: April 5, 2024 18:42 IST

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आदिवासी वाड्यातील बांधवांची खदखद

वैभव गायकर

पनवेल : 18 व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.याकरिता देशभरात वातावरण ढवळून निघत आहे.सत्ताधारी विरोधात एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत.विकसित भारत,डिजिटल भारत,तसेच विश्वगुरू भारताचे स्वप्न दाखवले जात असताना आजही पनवेल मधील असंख्य आदिवासी वाड्यामध्ये वीज आणि पाणी अशा मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत.      

या आदिवासी बांधवाना देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असताना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे.पनवेल तालुक्यात 70 पेक्षा जास्त आदिवासी वाड्या आहेत.अनेक आदिवासी वाड्या या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत.यांपैकीच घेरावाडी मध्ये अद्याप वीजही नाही.निवडणुकीच्या काळात सर्वपक्षीय नेते मोठ मोठे आश्वासन देतात.मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप एखाद्या वाडीत वीज पोहचलेली नसल्याची शोकांतिका असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर यांनी सांगितले.पनवेल मध्ये आंतराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे.पुढील वर्षी याठिकाणाहून विमानही उडणार आहे.शासनाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.मात्र एखाद्या वाडीत 70 वर्ष वीज नाही याबाबत प्रशासन एवढं सुस्त कस ? शासन,प्रशासनाला याबबत कोणतीच सोसर सुतक नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.घेरावाडीत 29 कुटुंब वास्तव्यास आहेत.शेकडो रहिवासी याठिकाणी राहत आहेत.प्रस्थापितांना घाबरून आदिवासी बांधव उघडपणे आपल्या समस्यावर बोलायला घाबरत आहेत.     

रस्ते,पाणी आणि वीज अशा पायाभूत सुविधांपासून घेरावाडी मधील आदिवासी बांधव वंचित आहेत.तर याच परिसरातील कोरलवाडीत देखील रस्ते आणि पाण्याची बोंब आहे.दोन्हीहि ग्रामपंचायती आपटा ग्रामपंचायती हद्दीत येतात.

प्रतिक्रिया -पनवेल मधील अनेक आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.घेरावाडीत अद्याप वीज पोहचलेली नाही.हि दुर्दैवाची बाब असून केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय नेत्यांची पाऊले आदिवासी वाड्यांकडे वळतात.- संतोष ठाकुर (सामाजिक कार्यकर्ते,पनवेल)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल