शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आम्हाला थ्री जी, फोरजी नको, केवळ पाणी आणि वीज द्या; आदिवासी बांधवांची खदखद

By वैभव गायकर | Updated: April 5, 2024 18:42 IST

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आदिवासी वाड्यातील बांधवांची खदखद

वैभव गायकर

पनवेल : 18 व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.याकरिता देशभरात वातावरण ढवळून निघत आहे.सत्ताधारी विरोधात एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत.विकसित भारत,डिजिटल भारत,तसेच विश्वगुरू भारताचे स्वप्न दाखवले जात असताना आजही पनवेल मधील असंख्य आदिवासी वाड्यामध्ये वीज आणि पाणी अशा मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत.      

या आदिवासी बांधवाना देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असताना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे.पनवेल तालुक्यात 70 पेक्षा जास्त आदिवासी वाड्या आहेत.अनेक आदिवासी वाड्या या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत.यांपैकीच घेरावाडी मध्ये अद्याप वीजही नाही.निवडणुकीच्या काळात सर्वपक्षीय नेते मोठ मोठे आश्वासन देतात.मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप एखाद्या वाडीत वीज पोहचलेली नसल्याची शोकांतिका असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर यांनी सांगितले.पनवेल मध्ये आंतराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे.पुढील वर्षी याठिकाणाहून विमानही उडणार आहे.शासनाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.मात्र एखाद्या वाडीत 70 वर्ष वीज नाही याबाबत प्रशासन एवढं सुस्त कस ? शासन,प्रशासनाला याबबत कोणतीच सोसर सुतक नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.घेरावाडीत 29 कुटुंब वास्तव्यास आहेत.शेकडो रहिवासी याठिकाणी राहत आहेत.प्रस्थापितांना घाबरून आदिवासी बांधव उघडपणे आपल्या समस्यावर बोलायला घाबरत आहेत.     

रस्ते,पाणी आणि वीज अशा पायाभूत सुविधांपासून घेरावाडी मधील आदिवासी बांधव वंचित आहेत.तर याच परिसरातील कोरलवाडीत देखील रस्ते आणि पाण्याची बोंब आहे.दोन्हीहि ग्रामपंचायती आपटा ग्रामपंचायती हद्दीत येतात.

प्रतिक्रिया -पनवेल मधील अनेक आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.घेरावाडीत अद्याप वीज पोहचलेली नाही.हि दुर्दैवाची बाब असून केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय नेत्यांची पाऊले आदिवासी वाड्यांकडे वळतात.- संतोष ठाकुर (सामाजिक कार्यकर्ते,पनवेल)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल