शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आम्हाला थ्री जी, फोरजी नको, केवळ पाणी आणि वीज द्या; आदिवासी बांधवांची खदखद

By वैभव गायकर | Updated: April 5, 2024 18:42 IST

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आदिवासी वाड्यातील बांधवांची खदखद

वैभव गायकर

पनवेल : 18 व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.याकरिता देशभरात वातावरण ढवळून निघत आहे.सत्ताधारी विरोधात एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत.विकसित भारत,डिजिटल भारत,तसेच विश्वगुरू भारताचे स्वप्न दाखवले जात असताना आजही पनवेल मधील असंख्य आदिवासी वाड्यामध्ये वीज आणि पाणी अशा मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत.      

या आदिवासी बांधवाना देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असताना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे.पनवेल तालुक्यात 70 पेक्षा जास्त आदिवासी वाड्या आहेत.अनेक आदिवासी वाड्या या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत.यांपैकीच घेरावाडी मध्ये अद्याप वीजही नाही.निवडणुकीच्या काळात सर्वपक्षीय नेते मोठ मोठे आश्वासन देतात.मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप एखाद्या वाडीत वीज पोहचलेली नसल्याची शोकांतिका असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकुर यांनी सांगितले.पनवेल मध्ये आंतराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे.पुढील वर्षी याठिकाणाहून विमानही उडणार आहे.शासनाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.मात्र एखाद्या वाडीत 70 वर्ष वीज नाही याबाबत प्रशासन एवढं सुस्त कस ? शासन,प्रशासनाला याबबत कोणतीच सोसर सुतक नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.घेरावाडीत 29 कुटुंब वास्तव्यास आहेत.शेकडो रहिवासी याठिकाणी राहत आहेत.प्रस्थापितांना घाबरून आदिवासी बांधव उघडपणे आपल्या समस्यावर बोलायला घाबरत आहेत.     

रस्ते,पाणी आणि वीज अशा पायाभूत सुविधांपासून घेरावाडी मधील आदिवासी बांधव वंचित आहेत.तर याच परिसरातील कोरलवाडीत देखील रस्ते आणि पाण्याची बोंब आहे.दोन्हीहि ग्रामपंचायती आपटा ग्रामपंचायती हद्दीत येतात.

प्रतिक्रिया -पनवेल मधील अनेक आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.घेरावाडीत अद्याप वीज पोहचलेली नाही.हि दुर्दैवाची बाब असून केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय नेत्यांची पाऊले आदिवासी वाड्यांकडे वळतात.- संतोष ठाकुर (सामाजिक कार्यकर्ते,पनवेल)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल