शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

जिल्ह्यात टँकरने येणारे पाणी अशुद्ध

By admin | Updated: May 9, 2016 02:04 IST

रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे टँकरने करण्यात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टँकरने पुरविण्यात येणाऱ्या शुद्ध पाण्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाने सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्जत तालुक्यातील कोल्होरे आणि धामोते नळ पाणीपुरवठा योजनेमार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध आहे. येथील पाण्याची तपासणी रसायनीच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने २ मे २०१६ रोजी केली आहे. येथील पाण्यामध्ये १६ पेक्षा जास्त कोलोफॉर्म्सचे घटक आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे. विशेष म्हणजे याच नदीपात्रात कपडे धुणे, गायी-म्हशी आंघोळ करताना आढळून आल्या आहेत. तर दुसरीकडे तेथीलच पाणी थेट टँकरमध्ये भरले जात असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ३० गावे आणि १७८ वाड्या अशा एकूण २०८ ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने या ठिकाणी २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हारेचे उदाहरण डोळ््यासमोर असताना अन्य टँकरने पुरविण्यात येणारे पाणी खरोखरच शुध्द आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरमधील पाणी शुध्द करून दिले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक गट विकास अधिकाऱ्याची आहे. ग्रामपंचायतीने टीसीएल पावडरचा साठा पंचायतीमध्ये ठेवणे बंधणकारक आहे. टँकरचे पाणी पिण्याऱ्या नागरिकांनी आधी ते शुध्द आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन फक्त टँकर मंजूर करते, असे जिल्हा सामान्य प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टँकरच्या मागणीप्रमाणे अनुदान पंचायत समितीस्तरावर वर्ग करतो. त्यामुळे पाण्याच्या शुध्दतेबाबत हे दोन्ही विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या दोन्ही विभागांकडे पाण्याच्या शुध्दतेबाबतचे रिपोर्ट नसल्याचे त्यांनीच सांगितले. कोणत्या ठिकाणाहून पाणी टँकरमध्ये भरले जाते. ते शुध्द आहे की अशुध्द आहे याची माहिती जिल्हाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आयुष्याशी अशुध्द पाण्याच्या माध्यमातून खेळ चालला आहे. याबाबतची तक्रार कर्जत-कोल्हारेचे विजय हजारे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकेडे २२ एप्रिल २०१६ रोजी केली होती.