शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

जिल्ह्यात टँकरने येणारे पाणी अशुद्ध

By admin | Updated: May 9, 2016 02:04 IST

रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे टँकरने करण्यात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टँकरने पुरविण्यात येणाऱ्या शुद्ध पाण्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाने सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्जत तालुक्यातील कोल्होरे आणि धामोते नळ पाणीपुरवठा योजनेमार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध आहे. येथील पाण्याची तपासणी रसायनीच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने २ मे २०१६ रोजी केली आहे. येथील पाण्यामध्ये १६ पेक्षा जास्त कोलोफॉर्म्सचे घटक आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे. विशेष म्हणजे याच नदीपात्रात कपडे धुणे, गायी-म्हशी आंघोळ करताना आढळून आल्या आहेत. तर दुसरीकडे तेथीलच पाणी थेट टँकरमध्ये भरले जात असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ३० गावे आणि १७८ वाड्या अशा एकूण २०८ ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने या ठिकाणी २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हारेचे उदाहरण डोळ््यासमोर असताना अन्य टँकरने पुरविण्यात येणारे पाणी खरोखरच शुध्द आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरमधील पाणी शुध्द करून दिले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक गट विकास अधिकाऱ्याची आहे. ग्रामपंचायतीने टीसीएल पावडरचा साठा पंचायतीमध्ये ठेवणे बंधणकारक आहे. टँकरचे पाणी पिण्याऱ्या नागरिकांनी आधी ते शुध्द आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन फक्त टँकर मंजूर करते, असे जिल्हा सामान्य प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टँकरच्या मागणीप्रमाणे अनुदान पंचायत समितीस्तरावर वर्ग करतो. त्यामुळे पाण्याच्या शुध्दतेबाबत हे दोन्ही विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या दोन्ही विभागांकडे पाण्याच्या शुध्दतेबाबतचे रिपोर्ट नसल्याचे त्यांनीच सांगितले. कोणत्या ठिकाणाहून पाणी टँकरमध्ये भरले जाते. ते शुध्द आहे की अशुध्द आहे याची माहिती जिल्हाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आयुष्याशी अशुध्द पाण्याच्या माध्यमातून खेळ चालला आहे. याबाबतची तक्रार कर्जत-कोल्हारेचे विजय हजारे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकेडे २२ एप्रिल २०१६ रोजी केली होती.