शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

महाडमधील चार गावांतील नळपाणी योजना ठप्प

By admin | Updated: December 26, 2016 07:07 IST

महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याजवळ असलेल्या कोतुर्डे धरणातून तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.

सिकंदर अनवारे / दासगांवमहाड तालुक्यातील रायगड किल्ल्याजवळ असलेल्या कोतुर्डे धरणातून तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. हे धरण महाड शहरापासून १२ किमी अंतरावर असून गांधारी नदीवर बांधण्यात आले आहे. हे धरण लघुपाटबंधारे कोलाड यांच्याकडे असून पाणी वसुली धरणाची देखरेख त्यांच्या अधिपत्याखालीच होते. सध्या नदीत पाण्याचा साठा असल्याने लघुपाटबंधारे विभाग या धरणातून पाणी सोडत नसून, अनेक ग्रामपंचायतींनी या नदीला ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने शेवटच्या टोकाला असलेल्या दासगाव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, करंजखोल या गावांच्या जॅकवेल ठिकाणी पाणीच नसल्याने या गावच्या नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे या गावांना पाणीटंचाईची झळ बसली असून लघुपाटबंधाऱ्याच्या या धोरणामुळे काही दिवसातच जनता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महाड तालुका पंचायत समिती सदस्य विनीता चांढवेकर यांनी दिली आहे.महाड तालुक्यातील किल्ले रायगडजवळच असलेल्या कोतुर्डे या गावाच्या ठिकाणी धरण आहे. या धरणाच्या पाण्यावर या विभागातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. हे धरण महाड शहरापासून १२ किमी अंतरावर आहे. या धरणाचे पाणी गांधारी नदीमध्ये फेब्रुवारीपासून सोडण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या धरणाला भलेमोठे भगदाड पडले होते. यामुळे २२ ग्रामपंचायतींची, तसेच महाड शहराची नळपाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. गेल्या वर्षी लघुपाटबंधारे विभागाने या धरणाच्या डागडुजीवर १८ लाख रुपये खर्च करून याची दुरुस्ती करत यावर असणारी योजना कायम ठेवली. दरवर्षी एप्रिल अखेरीस या धरणाच्या पाण्याची पातळी कमी होते. यामुळे धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जॅकवेलजवळ पाणी राहत नाही. याचा फ टका दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहीलनगर, गांधारपाले, करंजखोल यांना बसून या गावांची नळपाणी पुरवठा पुढील पावसापर्यंत ठप्प होती. यंदाच्या महाड तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे दरवर्षीपेक्षा येथील पातळीमध्ये अडीच फुटाने पाण्याची पातळी वाढलेली आहे. यामुळे महिन्यापर्यंत या धरणाचे पाणीपुरवठा होईल, असे लघुपाटबंधारे विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.गांधारी नदीही बारमाही वाहणारी नसून पावसाळ्यानंतर कोतुर्डे धरणाच्या सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळेच वाहत असते. सध्याच्या परिस्थितीत या नदीमध्ये वाहणारे पाणी कमी झाले असून या नदीमध्ये कोतुर्डे ते मोहप्रे या १२ किमी अंतरावर अनेक गावांच्यानळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेल आहेत. कमी झालेल्या पाण्याच्या पातळीमुळे प्रत्येकाने आपल्या जॅकवेलजवळ बंधारे बांधून पाणी अडवले आहेत. तसेच या भागामध्ये नदीलगत अनेक वीटभट्टी व्यावसायिक आहेत. मात्र त्यांनी देखील आपल्या उद्योगासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे. शेवटी असलेल्या दासगांव, वहूर, गांधारपाले, करंजखोल यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जॅकवेल सध्या कोरड्याच पडल्या आहेत. त्याचप्रमाणे लघुपाटबंधारे विभाग दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नदीला पाणी सोडण्याचे काम करतो. त्यामुळे ते यावेळी ग्रा. पं. च्या पाणी सोडण्याच्या मागणीला धुडकावत आहेत. यामुळे दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहीलनगर, गांधारपाले, करंजखोल या गावांची नळपाणी पुरवठा ठप्प झाली आहे. सध्या या गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.