शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

महाडमधील चार गावांतील नळपाणी योजना ठप्प

By admin | Updated: December 26, 2016 07:07 IST

महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याजवळ असलेल्या कोतुर्डे धरणातून तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.

सिकंदर अनवारे / दासगांवमहाड तालुक्यातील रायगड किल्ल्याजवळ असलेल्या कोतुर्डे धरणातून तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. हे धरण महाड शहरापासून १२ किमी अंतरावर असून गांधारी नदीवर बांधण्यात आले आहे. हे धरण लघुपाटबंधारे कोलाड यांच्याकडे असून पाणी वसुली धरणाची देखरेख त्यांच्या अधिपत्याखालीच होते. सध्या नदीत पाण्याचा साठा असल्याने लघुपाटबंधारे विभाग या धरणातून पाणी सोडत नसून, अनेक ग्रामपंचायतींनी या नदीला ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने शेवटच्या टोकाला असलेल्या दासगाव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, करंजखोल या गावांच्या जॅकवेल ठिकाणी पाणीच नसल्याने या गावच्या नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे या गावांना पाणीटंचाईची झळ बसली असून लघुपाटबंधाऱ्याच्या या धोरणामुळे काही दिवसातच जनता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महाड तालुका पंचायत समिती सदस्य विनीता चांढवेकर यांनी दिली आहे.महाड तालुक्यातील किल्ले रायगडजवळच असलेल्या कोतुर्डे या गावाच्या ठिकाणी धरण आहे. या धरणाच्या पाण्यावर या विभागातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. हे धरण महाड शहरापासून १२ किमी अंतरावर आहे. या धरणाचे पाणी गांधारी नदीमध्ये फेब्रुवारीपासून सोडण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या धरणाला भलेमोठे भगदाड पडले होते. यामुळे २२ ग्रामपंचायतींची, तसेच महाड शहराची नळपाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. गेल्या वर्षी लघुपाटबंधारे विभागाने या धरणाच्या डागडुजीवर १८ लाख रुपये खर्च करून याची दुरुस्ती करत यावर असणारी योजना कायम ठेवली. दरवर्षी एप्रिल अखेरीस या धरणाच्या पाण्याची पातळी कमी होते. यामुळे धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जॅकवेलजवळ पाणी राहत नाही. याचा फ टका दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहीलनगर, गांधारपाले, करंजखोल यांना बसून या गावांची नळपाणी पुरवठा पुढील पावसापर्यंत ठप्प होती. यंदाच्या महाड तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे दरवर्षीपेक्षा येथील पातळीमध्ये अडीच फुटाने पाण्याची पातळी वाढलेली आहे. यामुळे महिन्यापर्यंत या धरणाचे पाणीपुरवठा होईल, असे लघुपाटबंधारे विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.गांधारी नदीही बारमाही वाहणारी नसून पावसाळ्यानंतर कोतुर्डे धरणाच्या सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळेच वाहत असते. सध्याच्या परिस्थितीत या नदीमध्ये वाहणारे पाणी कमी झाले असून या नदीमध्ये कोतुर्डे ते मोहप्रे या १२ किमी अंतरावर अनेक गावांच्यानळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेल आहेत. कमी झालेल्या पाण्याच्या पातळीमुळे प्रत्येकाने आपल्या जॅकवेलजवळ बंधारे बांधून पाणी अडवले आहेत. तसेच या भागामध्ये नदीलगत अनेक वीटभट्टी व्यावसायिक आहेत. मात्र त्यांनी देखील आपल्या उद्योगासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे. शेवटी असलेल्या दासगांव, वहूर, गांधारपाले, करंजखोल यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जॅकवेल सध्या कोरड्याच पडल्या आहेत. त्याचप्रमाणे लघुपाटबंधारे विभाग दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नदीला पाणी सोडण्याचे काम करतो. त्यामुळे ते यावेळी ग्रा. पं. च्या पाणी सोडण्याच्या मागणीला धुडकावत आहेत. यामुळे दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहीलनगर, गांधारपाले, करंजखोल या गावांची नळपाणी पुरवठा ठप्प झाली आहे. सध्या या गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.