शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 07:08 IST

नवी मुंबई पालिकेविरोधात नाराजी; पिण्याचे बाटलीभर पाणी पुरवून वापरण्याची वेळ

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याअभावी नैसर्गिक विधीसाठी घर गाठावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या वीजपंपात बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून शाळेत पिण्यासह वापराच्या पाण्याची टंचाई भासत आहे. 

घशाची कोरड भागवण्यासाठी विद्यार्थी पाण्याची बाटली सोबत घेऊन येत आहेत. परंतु, नैसर्गिक विधीसाठी मात्र त्यांना घर अथवा जवळचे सार्वजनिक शौचालय गाठावे लागत आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे घणसोली सेक्टर ७ येथील महापालिका शाळेतील सुमारे अडीच हजार विद्यार्थी व शिक्षकांचे तीन दिवसांपासून हाल होत आहेत. येथे महापालिकेच्या शाळा क्रमांक ४२, ७६ व १०५ अशा तीन शाळा भरतात. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या दोन, तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. एकाच इमारतीमध्ये भरणाऱ्या या तीन शाळांमध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिकत आहेत. सुमारे ३५० शिक्षक कार्यरत आहेत. भूमिगत टाकीतून पंपाद्वारे पाणी पुरवले जाते. परंतु, बुधवारी त्यात बिघाड झाला. त्याच दिवशी दुरुस्ती होणे अपेक्षित असताना महापालिकेचा विद्युत विभाग व संबंधित सर्वच विभागांकडून दुर्लक्ष झाले. विद्यार्थी व शिक्षक पिण्यासाठी पाण्याची बाटली सोबत घेऊन येत आहेत. 

टाकीचे दोन्ही पंप खराब झाल्याने शाळेला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पंप टाकीच्या तळाशी असल्याने काढण्यासाठी टाकीतील पाण्याचा उपसा करण्यात एक दिवस गेला. गुरुवारी दोन्ही पंप दुरुस्तीसाठी पाठविले आहेत. - सखाराम खाडे, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका