शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 07:08 IST

नवी मुंबई पालिकेविरोधात नाराजी; पिण्याचे बाटलीभर पाणी पुरवून वापरण्याची वेळ

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याअभावी नैसर्गिक विधीसाठी घर गाठावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या वीजपंपात बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून शाळेत पिण्यासह वापराच्या पाण्याची टंचाई भासत आहे. 

घशाची कोरड भागवण्यासाठी विद्यार्थी पाण्याची बाटली सोबत घेऊन येत आहेत. परंतु, नैसर्गिक विधीसाठी मात्र त्यांना घर अथवा जवळचे सार्वजनिक शौचालय गाठावे लागत आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे घणसोली सेक्टर ७ येथील महापालिका शाळेतील सुमारे अडीच हजार विद्यार्थी व शिक्षकांचे तीन दिवसांपासून हाल होत आहेत. येथे महापालिकेच्या शाळा क्रमांक ४२, ७६ व १०५ अशा तीन शाळा भरतात. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या दोन, तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. एकाच इमारतीमध्ये भरणाऱ्या या तीन शाळांमध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिकत आहेत. सुमारे ३५० शिक्षक कार्यरत आहेत. भूमिगत टाकीतून पंपाद्वारे पाणी पुरवले जाते. परंतु, बुधवारी त्यात बिघाड झाला. त्याच दिवशी दुरुस्ती होणे अपेक्षित असताना महापालिकेचा विद्युत विभाग व संबंधित सर्वच विभागांकडून दुर्लक्ष झाले. विद्यार्थी व शिक्षक पिण्यासाठी पाण्याची बाटली सोबत घेऊन येत आहेत. 

टाकीचे दोन्ही पंप खराब झाल्याने शाळेला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पंप टाकीच्या तळाशी असल्याने काढण्यासाठी टाकीतील पाण्याचा उपसा करण्यात एक दिवस गेला. गुरुवारी दोन्ही पंप दुरुस्तीसाठी पाठविले आहेत. - सखाराम खाडे, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका