शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विहीर खचल्याने गावात पाणीटंचाई; भर पावसात पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:44 IST

पनवेलमधील आदिवासीवाडीतील घटना

पनवेल : तालुक्यातील बोंडारपाडा येथील विहिरीचे बांधकाम गुरुवारी कोसळले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

बोंडारपाडा ही आदिवासीवाडी असून येथील नागरिक विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरतात. ही विहीर २००९ मध्ये बांधण्यात आली. मात्र, अवघ्या दहा वर्षांत ती कोसळल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विहिरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बोंडारपाडा गावामध्ये २५ ते २६ कुटुंबे असून याच विहिरीच्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवितात. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने विहीर कोसळली. विहिरीचे बांधकाम दगडाचे आहे. मात्र, दगड रचताना वापरण्यात आलेले सिमेंट निकृष्ट दर्जाचे असावे. त्यामुळेच पावसाचा जोर वाढताच विहिरीचा एका बाजूचा भाग खचला आणि विहीर कोसळली.

पावसात विहीर कोसळल्याने ऐन पावसाळ्यात बोंडारपाडा गावातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावाच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची दुसरी विहीर नसल्यामुळे महिलांना बोअरवेल किंवा इतर ठिकाणांवरील विहिरीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही विहीर कोसळल्याने शंभरहून अधिक नागरिकांची गैरसोय झाली आहे. याबद्दल पंचायत समितीचे बीडीओ धोंडू तेटगुरे यांना विचारले असता बोअरवेलमध्ये पाइप टाकून पाण्याचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सांगितले.