शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: July 24, 2015 03:01 IST

: मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत

नवी मुंबई : मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत असल्याचे उघड झाले आहे. स्थायी समितीमध्ये याविषयी लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनास धारेवर धरले आहे. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मोरबे धरणामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. उन्हाळ्यात सर्व महापालिकांना पाणीकपात करावी लागत असताना नवी मुंबईकरांना मात्र मुबलक पाणी मिळते. परंतु साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याची उधळपट्टी वाढू लागली आहे. पिण्याचे पाणी उद्यान व इतर कामांसाठीही वापरले जात आहे. शहरात होणारा पाणीपुरवठा व पाणीगळतीविषयी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शहरात सद्यस्थितीत ४२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत आहे. एकूण पाण्यापैकी तब्बल ८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण कोपरखैरणे व दिघा परिसरातील एकूण रहिवाशांना जेवढे पाणी लागते तेवढे आहे. याविषयी नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. पाणीगळतीची चौकशी झाली पाहिजे. नक्की पाणी कुठे मुरत आहे हे पाहून ठोस उपाययोजना करण्याची मागणी शिवराम पाटील यांनी केली. ऐरोली व दिघा परिसरांतील नागरिकांना वारंवार शट्डाऊनला सामोरे जावे लागत असल्याचे एम. के. मढवी यांनी निदर्शनास आणून दिले. झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना नळजोडणी वेळेवर मिळत नसल्याची खंत अपर्णा गवते व जगदीश गवते यांनी व्यक्त केली. सीआरझेडमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेने स्काडा तंत्राचा वापर केला होता, त्याचा काय उपयोग झाला, अशी विचारणा रवींद्र इथापे यांनी केली. झोपडपट्टीमध्ये अनेकांना पाणी दिले जात नसून त्यांचा नैसर्गिक हक्क डावलला जात असल्याचे रामचंद्र घरत यांनी स्पष्ट केले आणि नळजोडणीची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली. सभागृहनेते जयवंत सुतार यांनीही चोरीच्या नळजोडणी तपासाव्यात. पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली. शहरात पाणी मुबलक असले तरी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात गंभीर परिणाम होतील, असेही निदर्शनास आणून दिले.