शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

मृगगडावरील जलसाठे पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त होणार, श्रमदानातून टाक्यांची साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 05:14 IST

सुधागड तालुक्यामधील मृगगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. गडावर जाण्यासाठी माहिती फलक बसविण्यात आले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : सुधागड तालुक्यामधील मृगगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. गडावर जाण्यासाठी माहिती फलक बसविण्यात आले आहेत. श्रमदान करून पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढण्याचे कामही सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी सर्व जलसाठे गाळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.गड - किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे ऐतिहासिक वैभव. ही संपत्ती जपण्यासाठी पूर्णत: शासनावर अवलंबून न राहता शिवप्रेमी तरुणांनी व संस्थांनी अनेक किल्ल्यांवर स्वत:च संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुर्लक्षित गड किल्ल्यांवर मोहिमांचे आयोजन करून तेथील इतिहास जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. राज्यातील काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये सुधागड तालुक्यामधील मृगगडाचाही समावेश होतो. आंबेनळी घाटाला लागून असलेल्या डोंगररांगांमध्ये टेहळणीसाठी याची उभारणी करण्यात आली. खोपोली-पाली रोडवरून आतमध्ये भेलीव गावच्या मागील बाजूला हा किल्ला असून भेलीवचा किल्ला असेही त्याला संबोधले जाते. गडाच्या काळ्या खडकामध्ये गुहा पाहण्यासारखी आहे. गडावर खडक फोडून पाण्याच्या टाक्या तयार केल्या आहेत. वाड्याचे अवशेषही पहावयास मिळत आहे. गडावर शिवलिंग व इतर मूर्तीही असून मंदिराच्या बाहेर दीपमाळ आहे. भेलीव गावातील जंगलातून वाट काढून व दोन्ही खडकांच्या मध्ये असलेल्या अरुंद वाटेने गडावर जावे लागते. खडक फोडून पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.मृगगडावर दुर्गवीर संस्थेच्यावतीने श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू आहे. संस्थेचे प्रमुख संतोष हसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी गडाला भेट देत आहेत. गडावर जाणाºया मार्गावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. वाड्याचे अवशेष व मंदिर परिसराची साफसफाई केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. काही टाके मातीने पूर्णपणे भरून गेले आहेत. यामुळे या टाक्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.१० फेब्रुवारीलाही दहा तरुणांनी श्रमदान मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. दिवसभर टाक्यातील गाळ काढण्यात आला. पावसाळ्यापूर्वी सर्व जलसाठ्यांमधील गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्या अल्पेश पाटील त्यांनी दिली. जलसाठे गाळमुक्त झाल्यामुळे त्याचा लाभ गडावर येणाºया पर्यटकांना व आजूबाजूच्या जंगलातील प्राणी व पक्ष्यांनाही होणार आहे.मोहिमेमधीलसहभाग वाढतोयमृगगड संवर्धनासाठी रविवारी आयोजित केलेल्या श्रमदान मोहिमेमध्ये अल्पेश पाटील, प्रकाश फ्राकते, भूषण नाडकर्णी, विशाल इंगळे, एकनाथ अस्वले, रितेश कडू, आकाश धावडे, महेंद्र बाबर, प्रदीप माडके, किशोर सांगळे यांनी सहभाग घेतला होता. गडाचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आयोजित केलेल्या या मोहिमांमध्ये श्रमदान करणाºयांची संख्या वाढू लागली आहे.

टॅग्स :Fortगड