शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:56 IST

जनतेमध्ये रोष : प्रशासनावर बेफिकीर कारभाराचा आरोप; दोन-दोन दिवस पाणी नाही

वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसांनी होऊ लागला आहे. त्यामुळे पनवेलकरांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांत कमालीचा संताप असून, याचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या ‘पाणी’बाणीला महापालिका प्रशासनाचा बेफिकीर कारभार जबाबदार असल्याचा आरोप पनवेलकरांकडून होत आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको, एमजेपी आणि एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल शहराला दिवसाला २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात केवळ १७ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, हे पाणीसुद्धा दिवसाआड देण्याचे धोरण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात दोन-दोन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे अनेक भागातील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने शहरात टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. रोहिदास वाडा, भुसार मोहल्ला, पटेल मोहल्ला, प्रभूआळी, परदेशीआळी, अशोका गार्डन, लोखंडीपाडा, सावरकर चौक आदी ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याने कोणत्या वेळी पाणी येईल, याचा नेम नाही. त्यामुळे रहिवाशांना २४ तास नळाकडे डोळे लावून बसावे लागत आहे. या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे शहरवासीयांना कायमस्वरूपी या पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.पनवेल पालिका हद्दीतील ग्रामीण भागालाही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागाला दिवसाला २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी इतकेच पाणी दिले जात आहे. सिडको कार्यक्षेत्रातील वसाहतींनाही पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात या पाणीसमस्येवरून येत्या काळात उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. नागरिकांच्या दूरध्वनीला प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांविषयी जनतेत रोष निर्माण झाला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रत्येक आठवड्याला सोमवार आणि मंगळवारी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे मागील दोन दिवस पाण्याची समस्या निर्माण झाली. तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठाही सलग नसल्याने या समस्येत भर पडली आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत दिला जाणारा पाणी भरण्याचा पॉइंट केवळ दोन इंच व्यासाचा आहे. त्यामुळे एक टँकर भरायला अर्धा ते एक तास लागत आहे. याचा परिणाम म्हणून दिवसभरात ५० टँकर भरणे शक्य होत नाही.- रामदास तायडे,पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महापालिकागाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी रॉयल्टी माफ करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला वेग प्राप्त होईल, तसेच पनवेल शहरातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहोत.- नीलेश बाविस्कर,सभापती, पाणीपुरवठा मलनि:सारण समितीपनवेल शहरात अशा प्रकारची भीषण समस्या कधीच उद्भवली नव्हती. सत्ताधाºयांच्या मार्फत याबाबतही राजकारण केले जात आहे. प्रशासनावर दबाव आणून टँकर आपल्या प्रभागात वळविण्याचे काम सध्या सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे पनवेलवासीयांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.- डॉ. सुरेखा मोहोकर,नगरसेविका,पनवेलटँकर लॉबीपनवेल शहरातील नागरिकांना नाईलाजास्तव टँकरने पाणी मागवावे लागत आहे. ही बाब टँकरमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे एका टँकरसाठी १५०० ते २५०० रुपयांची आकारणी केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.५० टँकर पाण्याचे नियोजन नाहीपनवेलला नवी मुंबईत महापालिकेने दररोज ५० टँकर पाणी द्यायला सुरुवात केली आहे; परंतु पनवेल महापालिकेकडून या टँकरचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणी असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. यातच पनवेल महापालिकेकडे पुरेसे टँकर नाहीत. त्यामुळे दरदिवशी ५० टँकर पाणी घेण्यास पनवेल महापालिका अपयशी ठरताना दिसत आहे.विहिरी पुनर्जीवित करण्याची गरजशहरात जवळपास २६ विहिरी आहेत. यापैकी अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या विहिरींची निगा राखल्यास त्या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी करता येईल.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड