शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:56 IST

जनतेमध्ये रोष : प्रशासनावर बेफिकीर कारभाराचा आरोप; दोन-दोन दिवस पाणी नाही

वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसांनी होऊ लागला आहे. त्यामुळे पनवेलकरांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांत कमालीचा संताप असून, याचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या ‘पाणी’बाणीला महापालिका प्रशासनाचा बेफिकीर कारभार जबाबदार असल्याचा आरोप पनवेलकरांकडून होत आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको, एमजेपी आणि एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल शहराला दिवसाला २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात केवळ १७ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, हे पाणीसुद्धा दिवसाआड देण्याचे धोरण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात दोन-दोन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे अनेक भागातील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने शहरात टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. रोहिदास वाडा, भुसार मोहल्ला, पटेल मोहल्ला, प्रभूआळी, परदेशीआळी, अशोका गार्डन, लोखंडीपाडा, सावरकर चौक आदी ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याने कोणत्या वेळी पाणी येईल, याचा नेम नाही. त्यामुळे रहिवाशांना २४ तास नळाकडे डोळे लावून बसावे लागत आहे. या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे शहरवासीयांना कायमस्वरूपी या पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.पनवेल पालिका हद्दीतील ग्रामीण भागालाही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागाला दिवसाला २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी इतकेच पाणी दिले जात आहे. सिडको कार्यक्षेत्रातील वसाहतींनाही पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात या पाणीसमस्येवरून येत्या काळात उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. नागरिकांच्या दूरध्वनीला प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांविषयी जनतेत रोष निर्माण झाला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रत्येक आठवड्याला सोमवार आणि मंगळवारी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे मागील दोन दिवस पाण्याची समस्या निर्माण झाली. तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठाही सलग नसल्याने या समस्येत भर पडली आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत दिला जाणारा पाणी भरण्याचा पॉइंट केवळ दोन इंच व्यासाचा आहे. त्यामुळे एक टँकर भरायला अर्धा ते एक तास लागत आहे. याचा परिणाम म्हणून दिवसभरात ५० टँकर भरणे शक्य होत नाही.- रामदास तायडे,पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महापालिकागाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी रॉयल्टी माफ करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला वेग प्राप्त होईल, तसेच पनवेल शहरातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहोत.- नीलेश बाविस्कर,सभापती, पाणीपुरवठा मलनि:सारण समितीपनवेल शहरात अशा प्रकारची भीषण समस्या कधीच उद्भवली नव्हती. सत्ताधाºयांच्या मार्फत याबाबतही राजकारण केले जात आहे. प्रशासनावर दबाव आणून टँकर आपल्या प्रभागात वळविण्याचे काम सध्या सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे पनवेलवासीयांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.- डॉ. सुरेखा मोहोकर,नगरसेविका,पनवेलटँकर लॉबीपनवेल शहरातील नागरिकांना नाईलाजास्तव टँकरने पाणी मागवावे लागत आहे. ही बाब टँकरमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे एका टँकरसाठी १५०० ते २५०० रुपयांची आकारणी केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.५० टँकर पाण्याचे नियोजन नाहीपनवेलला नवी मुंबईत महापालिकेने दररोज ५० टँकर पाणी द्यायला सुरुवात केली आहे; परंतु पनवेल महापालिकेकडून या टँकरचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणी असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. यातच पनवेल महापालिकेकडे पुरेसे टँकर नाहीत. त्यामुळे दरदिवशी ५० टँकर पाणी घेण्यास पनवेल महापालिका अपयशी ठरताना दिसत आहे.विहिरी पुनर्जीवित करण्याची गरजशहरात जवळपास २६ विहिरी आहेत. यापैकी अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या विहिरींची निगा राखल्यास त्या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी करता येईल.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड