शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पनवेलमध्ये पाण्याची गळती सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:31 IST

पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचवेळी एमजेपीच्या जलवाहिनीला गळती सुरूच असल्याचे दिसून आले आहे. एकूणच भीषण पाणीटंचाईत सुद्धा पाण्याचा अपव्यय सुरूच असल्याने पनवेलकरांनी संताप व्यक्त केला आहे.एमजेपीची भोकरपाडा ते कळंबोली दरम्यानची जलवाहिनी जुनी व जीर्ण झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागते, तर काही ठिकाणी झोपडीधारक व काही व्यावसायिक जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करतात. विशेष म्हणजे जलवाहिनीला एकदा छिद्र पाडले की, त्यातून सतत पाणी वाहत असते. ती दुरुस्त करण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याचा परिणाम म्हणून दरदिवशी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे पाण्याचा वारेमाप अपव्यय होत असल्याचे चित्र पनवेलमध्ये पाहावयास मिळत आहे. जीर्ण व जुन्या झालेल्या एमजेपीची जलवाहिन्या बदलण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. मात्र कार्यवाही काहीच झाली नाही. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेवून जलवाहिनी बदलण्याची गरज का आहे, हे सुध्दा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याचा परिणाम म्हणून जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. असे असले तरी सध्या ज्या ठिकाणी नियमित गळती होते त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे मत आहे. एकीकडे पाणीटंचाई आहे, तर दुसरीकडे पाण्याची गळती सुरू आहे. संबंधित प्रशासनाच्या गैरकारभाराचे हे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया सह्याद्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबनराव पवार यांनी व्यक्त केली आहे.>जलवाहिनीला गळती लागलेली ठिकाणेखांदा वसाहत, आसुडगाव, कळंबोली द्रुत महामार्गाच्या पुलाखाली एमजेपीच्या जलवाहिनीला बारा महिने गळती लागलेली असते. आजमितीससुद्धा याच ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात आहे. नवीन पनवेल आणि कळंबोलीत काही ठिकाणी पिण्याकरिता पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी कळंबोलीत वाद होत आहेत.वाय पॉइंट ते कळंबोली या दरम्यानची जलवाहिनी त्वरित बदलण्यात यावी अशी मागणी केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल, असा विश्वास वाटतो.- संतोष शेट्टी, नगरसेवक,पनवेल महापालिका