शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा जमा - खर्च जुळेना

By admin | Updated: August 25, 2015 00:54 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे नवी मुंबईमध्ये पाण्याची प्रचंड उधळपट्टी सुरू आहे. १९ टक्के पाणीगळती सुरू आहे. गळती व ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी यामुळे

-  नामदेव मोरे,  नवी मुंबई स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे नवी मुंबईमध्ये पाण्याची प्रचंड उधळपट्टी सुरू आहे. १९ टक्के पाणीगळती सुरू आहे. गळती व ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी यामुळे उत्पन्न व खर्चामध्ये मोठी तफावत येवू लागली आहे. पाणी बिलाची थकबाकीही ३३ कोटी ७४ लाख रुपयांवर गेली आहे. नवी मुंबईमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. मालकीचे धरण असल्यामुळे शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. परंतु उपलब्ध पाण्याचा योग्य वापर महापालिका करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडून या प्रश्नावर शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. शासनाकडेही पाठपुरावा केला आहे. शहरात तब्बल १९ टक्के पाणी गळती होत आहे. पिण्याचे पाणी उद्यान व इतर कारणांसाठी वापरले जात आहे.विहिरी, तलाव व मलनिस्सारण केंद्रामधील पाण्याचाही वापर केला जात नाही. २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी २० वर्षे पाणी बिल न वाढविण्याचे आश्वासन दिले. २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाण्याची घोषणा करण्यात आली. देशात सर्वात स्वस्त दरात पाणी देणारी महापालिका असा नावलौकिक मिळविण्यात आला. पाणी मुबलक असल्यामुळे चोवीस तास पाण्याचे वितरण सुरू करण्यात आले. सवंग लोकप्रियतेसाठी करण्यात आलेल्या घोषणा व धोरणांमुळे महापालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणी वितरणासाठी करण्यात येणारा खर्च पाणी बिलामधून वसूल झाला पाहिजे असा दंडक केंद्र शासनाचा आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी २०१० - ११ मध्ये १२७ कोटी ८१लाख रुपये खर्च झाला होता. पाणी बिलामधून ६५ कोटी ३० लाख रुपयेच वसूल झाले होते. २०१४ - १५ मध्ये ११५ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाले होते. परंतु पाणी बिलामधून ८६ कोटी ७७ लाख रुपये वसूल झाले. पाच वर्षामध्ये तब्बल ५५१ कोटी ७ लाख रुपये खर्च झाला असून फक्त ३७० कोटी २७ लाख रुपये वसूल झाले आहेत. सिडकोकडील ५ कोटी ४५ लाख, गावठाणात ७ कोटी १७ लाख, सामान्य भागात १० कोटी ५ लाख, वाणिज्य व सार्वजनिक परिसरात ७ कोटी १९ लाख रुपये असे ३५ कोटी २४ लाख रुपये थकबाकी होती. थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली असली तरी अद्याप ३३ कोटी ७४ लाख रुपये वसूल झालेले नाहीत. पालिकेने आतापर्यंत ४२२८ थकबाकीदारांना नोटीस दिल्या आहेत. पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणाशहरातील साडेबारा लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ५६ जलउदंचन केंद्रे आहेत. एबीआर व भूमिगत व उच्चस्तरीय असे एकूण ११४ जलकुंभ आहेत. मनपा क्षेत्रात १०८ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी असून ९७२ किलोमीटरचे अंतर्गत जाळे आहे. उधळपट्टी थांबविण्यासाठी पाठपुरावाकाँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी शहरातील पाण्याची उधळपट्टी व दुरुपयोगावर शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. महापालिकेमध्ये लक्षवेधी मांडली असून शासनाकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. नवी मुंबईकरांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी पाण्याचा दुरुपयोग थांबविला पाहिजे. पाण्याची उधळपट्टी व गळती थांबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.