शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पनवेलकरांवरील पाणीटंचाईचे संकट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:01 IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोकडून पाण्याचे नियोजन झाले नाही.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोकडून पाण्याचे नियोजन झाले नाही. त्याचबरोबर एमजेपीच्या वाहिन्या बदलण्याचा प्रस्तावही तळ्यात, मळ्यात आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. ही भीषणता दिसत असताना आणखी नवीन इमारती उभारण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात आणखी तुटवडा भासण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सिडकोबरोबरच मनापाकडूनही याबाबत धोरण आखले जात नसल्याने पुढे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे त्या तुलनेत महानगराची तहानही रोज वाढत चालली आहे. जवळपास १०० एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर या नोडमध्ये पाणीटंचाईची ओरड निर्माण झाली आहे. एमजेपीवर पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली ही तीन महत्त्वाची शहरे पाण्याकरिता अवलंबून आहेत. या वाहिन्या जीर्ण झाल्याने रोज फुटतात. त्या बदली करण्याकरिता किमान तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. मात्र, त्याची निविदा अद्याप निघालेली नाही. सिडको शहरे विकसित करते. मात्र, पायाभूत सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेने दिल्या पाहिजेत, असे सिडकोचे उच्चपदस्थ अधिकारी सांगतात. त्यांनी सेवाशुल्क घेतले असल्याने पाण्याचा स्रोत निर्माण करून तो महापालिकेकडे हस्तांतर करणे अपेक्षित असल्याचे कांबळे यांचे मत आहे. आता टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, काही ठिकाणी तर पिण्याकरिताही पाणी मिळत नाही. असे असताना सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतले आहेत. कळंबोली, तळोजा या ठिकाणी कामांचा धडाका सुरू आहे. याशिवाय आणखी २५ हजार घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन घरांना पाणी देणार कुठून, असा प्रश्न सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केला आहे. त्याचबरोबर खासगी इमारतींचेही बांधकाम रोडपाली, तळोजा, नावडे तसेच महापालिका क्षेत्रात सुरू आहे, त्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी ओरड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.>नेहमी टंचाईसदृश परिस्थिती असल्याने आम्ही सुरुवातीलाच पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, सत्ताधाऱ्याने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आणि कचरा हस्तांतरात रस दाखवला. आता कचराही वेळेत उचलला जात नाही आणि पाणीही नियमित मिळत नाही.- सतीश पाटील,नगरसेवक, राष्ट्रवादी>पाण्याची टंचाई असल्याने सिडकोने हाती घेतलेले गृहनिर्माण प्रकल्प बंद ठेवावेत, अशी मागणी आपण केलेली आहे. याबाबत मी आणि सभागृहनेते परेश ठाकुरांनी महासभेत सूचनाही मांडली. त्याचबरोबर नवीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी केली आहे. नियोजनाचे काम सिडकोचे आहे. मात्र, ते महापालिकेकडे बोट दाखवतात.- नीलेश बाविस्कर, नगरसेवक, भाजपा

टॅग्स :panvelपनवेल