शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

हॉटेलचे टाकाऊ अन्न रस्त्यावर, स्वच्छ भारत अभियानाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 3:33 AM

दुर्गंधीने नागरिक त्रस्त : स्वच्छता अभियानाचा फज्जा

नवी मुंबई : हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकाऊ अन्न रस्त्यावर अथवा कचराकुंडीच्या भोवती टाकले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून, भटक्या कुत्र्यांसह उंदरांनाही त्याठिकाणी आश्रय मिळत आहे; परंतु स्वच्छता अभियानाला खो घालणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात बहुतांश ठिकाणचे रस्तेच कचरा कुंड्या बनले आहेत. परिसरातील कचरा, कचरा कुंडीत टाकताना कुंडी भरल्यानंतरही तो त्याचठिकाणी टाकला जात आहे. यामुळे कुंड्यांमधील कचरा रस्त्यांवर पसरत आहे. या कचºयात हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया टाकाऊ अन्नाचाही समावेश दिसून येत आहे. यामुळे कचरा कुंडीच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत पालिकेकडून घरोघरी जनजागृती करण्यात आलेली आहे. मात्र, त्यात हॉटेल्स व्यावसायिकांचा समावेश होत नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आहे. मात्र, त्यांच्याकडून रस्त्यावर अथवा कचरा कुंडीत टाकल्या जाणाºया अन्नामुळे ते खाण्यासाठी त्याठिकाणी भटके कुत्रे, कावळे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत, तर अशा ठिकाणी घुशी व उंदरांचेही साम्राज्य आढळून येत आहे. परिणामी लगतच्या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे; परंतु अशा हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांवर पालिका कारवाईत चालढकल करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या नजरेतून लपवण्यासाठी रात्रीच्या वेळी हे टाकाऊ अन्न त्याठिकाणी टाकले जाते; परंतु दुसºया दिवशी दुपारपर्यंत हा कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर पडून राहिलेला कचरा व त्यामधील टाकाऊ अन्न यापासून दुर्गंधी पसरत आहे. घणसोलीत टाकल्या जाणाºया कचºयाने परिसराला बकालपणा आला आहे. त्यामुळे कारवाईची मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई