शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बोनसरीत भंगार गोदामांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:36 IST

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत.

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावात अशाच प्रकारे तीन ते चार भंगारविक्रेत्यांनी एक बंद पडलेल्या कारखान्याच्या जागेवर गोदामे थाटली आहेत. त्यामुळे परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच भुरट्या चोºयांत वाढ झाल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.अशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून टीटीसी क्षेत्राची ओळख आहे. सुमारे २५ कि.मी. क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या नियोजनात एमआयडीसी प्रशासनाला पुरते अपयश आले आहे. मागील दीड-दोन दशकांत विविध कारणांमुळे या क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी इतर टाळेबंदी जाहीर करून इतर राज्यांत स्थलांतरण केले आहे. बंद पडलेल्या या कारखान्यांतील यंत्र व इतर लोखंडी साहित्यावर भंगारमाफियांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम या संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी भंगारचोरांचा बोलबाला असतो. स्थानिक पुढारी आणि पोलिसांना हाताशी धरून बिनदिक्कतपणे भंगाराची दुकाने उभारली जात आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावाजवळ बंद पडलेल्या एका कंपनीच्या प्रशस्त जागेवर मागील तीन महिन्यांपासून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. विशेष म्हणजे, या गोदामांना अधिकृत वीज व पाणीपुरवठा नाही. त्यामुळे संबंधितांकडून वीज व पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या बेकायदा गोदामामुळे परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांमुळे सिमेंटच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासनाकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.बोनसरी प्रमाणेच एमआयडीसीच्या प्रत्यक्ष क्षेत्रात भंगारविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या अंधारात बंद पडलेल्या कारखान्यातील सुरक्षारक्षकांना धमकावून लोखंडी साहित्य, केमिकल्सचे ड्रम व इतर सामग्रीची चोरी केली जाते. या भंगारचोरीच्या मागे या क्षेत्रात बेकायदेशीरपणे उभारलेल्या गोदामचालकांचाच हात असल्याचे याअगोदर अनेकदा स्पष्ट झाले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही या बेकायदेशीर व्यवसायाला नक्की कोणाचे पाठबळ मिळते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.>कारखानदारांची डोकदुखीविविध कारणांमुळे एमआयडीसीतील शेकडो कंपन्या बंद पडल्या आहेत. या बंद पडलेल्यांपैकी अनेक कंपन्यांच्या परिसरातील मोकळ्या जागांवर भंगाराची गोदामे, हॉटेल्स व गॅरेजेस थाटली आहेत. या अतिक्रमणाला स्थानिक पुढारी, एमआयडीसीचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचे अप्रत्यक्ष अभय आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची अतिक्रमित जागा परत मिळविताना कारखानदारांची कसरत होत आहे. भंगारविक्रेत्यांशी दोन हात करण्याऐवजी अनेकांनी न्यायालयाचा आधार घेतला आहे. या माध्यमातून न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे.