शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

बोनसरीत भंगार गोदामांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:36 IST

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत.

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावात अशाच प्रकारे तीन ते चार भंगारविक्रेत्यांनी एक बंद पडलेल्या कारखान्याच्या जागेवर गोदामे थाटली आहेत. त्यामुळे परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच भुरट्या चोºयांत वाढ झाल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.अशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून टीटीसी क्षेत्राची ओळख आहे. सुमारे २५ कि.मी. क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या नियोजनात एमआयडीसी प्रशासनाला पुरते अपयश आले आहे. मागील दीड-दोन दशकांत विविध कारणांमुळे या क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी इतर टाळेबंदी जाहीर करून इतर राज्यांत स्थलांतरण केले आहे. बंद पडलेल्या या कारखान्यांतील यंत्र व इतर लोखंडी साहित्यावर भंगारमाफियांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम या संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी भंगारचोरांचा बोलबाला असतो. स्थानिक पुढारी आणि पोलिसांना हाताशी धरून बिनदिक्कतपणे भंगाराची दुकाने उभारली जात आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावाजवळ बंद पडलेल्या एका कंपनीच्या प्रशस्त जागेवर मागील तीन महिन्यांपासून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. विशेष म्हणजे, या गोदामांना अधिकृत वीज व पाणीपुरवठा नाही. त्यामुळे संबंधितांकडून वीज व पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या बेकायदा गोदामामुळे परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांमुळे सिमेंटच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासनाकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.बोनसरी प्रमाणेच एमआयडीसीच्या प्रत्यक्ष क्षेत्रात भंगारविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या अंधारात बंद पडलेल्या कारखान्यातील सुरक्षारक्षकांना धमकावून लोखंडी साहित्य, केमिकल्सचे ड्रम व इतर सामग्रीची चोरी केली जाते. या भंगारचोरीच्या मागे या क्षेत्रात बेकायदेशीरपणे उभारलेल्या गोदामचालकांचाच हात असल्याचे याअगोदर अनेकदा स्पष्ट झाले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही या बेकायदेशीर व्यवसायाला नक्की कोणाचे पाठबळ मिळते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.>कारखानदारांची डोकदुखीविविध कारणांमुळे एमआयडीसीतील शेकडो कंपन्या बंद पडल्या आहेत. या बंद पडलेल्यांपैकी अनेक कंपन्यांच्या परिसरातील मोकळ्या जागांवर भंगाराची गोदामे, हॉटेल्स व गॅरेजेस थाटली आहेत. या अतिक्रमणाला स्थानिक पुढारी, एमआयडीसीचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचे अप्रत्यक्ष अभय आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची अतिक्रमित जागा परत मिळविताना कारखानदारांची कसरत होत आहे. भंगारविक्रेत्यांशी दोन हात करण्याऐवजी अनेकांनी न्यायालयाचा आधार घेतला आहे. या माध्यमातून न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे.