शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्यांचा विकासकामांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:41 IST

पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत कोणत्याही प्रकाराची विकासकामे झाली नसल्याची ओरड सत्ताधा-यांसह विरोधक करीत आहेत.

वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत कोणत्याही प्रकाराची विकासकामे झाली नसल्याची ओरड सत्ताधा-यांसह विरोधक करीत आहेत. विकासाचा दुवा मानल्या जाणा-या प्रभाग समित्या स्थापन झाल्या नसल्याने पालिका क्षेत्रातील विकासावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. विरोधकांनी प्रभाग समित्यांच्या स्थापनेवरून उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याने हा विषय आणखीच चिघळणार आहे व याचा परिणाम पनवेलच्या विकासावर पडणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या दुस-या महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रशासनामार्फत तयार केलेल्या प्रभाग समित्यांचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. २० प्रभागांसाठी या वेळी चार प्रभाग समित्या स्थापन करण्यात पहिल्या प्रभाग समितीची रचना १ ते ५ प्रभाग, दुसºया प्रभाग समितीची रचना ६ ते १० प्रभाग, तिस-या प्रभाग समितीची रचना ११ ते १५ प्रभाव व शेवटची चौथी प्रभाग समितीची रचना १६ ते २० अशी होती. प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीच्या रचनेमुळे पहिल्या समितीच्या सभापतीपदी शेकाप आघाडीचा सदस्य बसणार होता. तर दुस-या समितीत सदस्य संख्या समान असल्याने ही समितीदेखील सत्ताधारी भाजपाच्या हातून निसटू शकते, अशी भीती सत्ताधा-यांना वाटत असल्याने त्यांनी प्रशासनाचा प्रस्ताव बाजूला ठेवत नव्याने प्रभाग समित्या स्थापन केल्या. विशेष म्हणजे, बहुमताने तो प्रस्तावदेखील पारित केल्याचा आरोप विरोधकांनी केला. सत्ताधारी भाजपाने स्थापन केलेल्या प्रभाग समित्यांची रचना पहिली प्रभाग समिती १ ते ६ प्रभाग, दुसरी प्रभाग समिती ७, ८, ९, १०, १५, १६ प्रभाग. तिसरी प्रभाग समिती ११, १२, १३, १४, चौथी प्रभाग समिती १७, १८, १९, २० या प्रकारे आहे. या प्रभाग समित्यांच्या विरोधात विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेत या प्रभाग समित्यांना आव्हान दिले आहे. सत्ताधाºयांनी स्थापन केलेल्या समित्यांमुळे विरोधकांच्या हातातून एका समितीचे सभापतीपद निसटणार होते. प्रभागांची रचना बदलल्याने नागरिकांना त्रास होणार ही बाजू मांडत शेकाप आघाडीच्या सदस्यांनी सत्ताधाºयांनी स्थापन केलेल्या समित्यांना विरोध दर्शवत न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. विरोधक महासभेत विकासाच्या नावाखाली प्रशासनाला दोष देत आहेत. प्रभाग समित्यांची स्थापना सत्ताधारी आणि विरोधकांच्या अंतर्गत वादामुळे रखडली आहेत. प्रभाग समितीला पाच लाखांपर्यंतची कामे मार्गी लावण्याचा अधिकार असतो. वर्षभरात प्रत्येक नगरसेवकामार्फत ५० लाखांपर्यंतच्या कामांना प्रभाग समिती मंजुरी देऊ शकते.>प्रभाग समित्यांची रचना शासनाच्या नियमानुसार केली जाते. मात्र, सत्ताधारी भाजपाने मनमानी करून या समित्यांच्या रचनेत छेडछाड करून आपल्या बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने समित्यांची स्थापना केली. याचाच परिणाम पनवेलच्या विकासकामांवर झाला आहे. ग्रामीण भागात शेकापचे वर्चस्व आहे. पहिल्या प्रभाग समितीचे सभापतीपद शेकापला मिळणार हे पाहूनच सत्ताधाºयांनी मनमानी पद्धतीने प्रभाग समितीची स्थापना केली आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका>प्रशासनाने केलेली प्रभाग समित्यांची रचना अत्यंत चुकीची होती. खारघर शहरातील रहिवासी आपली समस्या घेऊन कळंबोली येथील प्रभाग कार्यालयात कशासाठी येईल? त्याच्याकरिता खारघरमध्येच त्या प्रभागाचे समावेश असणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने चुकीच्या पद्धतींनी प्रभाग समित्यांची रचना केली. दुसºया महासभेत नव्याने प्रभाग समिती स्थापनेचा निर्णय झाला असताना देखील प्रशासन सहा महिने गप्प का होते? प्रशासनाने या प्रभाग समित्यांना मान्यता दिली असती तर दारूबंदीचा निर्णयदेखील तेव्हाच झाला असता. प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे.- परेश ठाकूर, सभागृह नेते>प्रभाग समित्यांच्या स्थापनेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने त्याच्यावर बोलणे योग्य होणार नाही.- डॉ. सुधाकर शिंदे,आयुक्त, पनवेल महानगरपालिका>सत्ताधारी पनवेल महानगरपालिकेचा विकास होत नसल्याचे सांगत आहे. मात्र, प्रभाग समित्यांच्या स्थापनेला सत्ताधाºयांनीच खोडा घातला आहे. भाजपाच्या आडमुठे धोरणामुळे पनवेल महानगरपालिकेचा विकास खुंटला आहे.- अरविंद म्हात्रे,नगरसेवक, शेकाप