शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Viral Video: "दातं आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
6
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
7
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
8
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
10
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
11
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
12
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
13
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
14
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
15
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
17
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
18
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
19
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
20
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार

कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 01:22 IST

शासनाची पाणी योजना अद्याप पोहोचलीच नाही; आदिवासींचे हाल

ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही.

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धाब्याचीवाडी या आदिवासी बांधवांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तेथील महिलांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण करावी लागत आहे. शासनाच्या पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने मैलोन‌्मैल पायपीट करून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही. काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आल्या; मात्र त्याही पाणीच नसल्याने बिनकामाच्या ठरत आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या पाणी वाहतुकीच्या फिरत्या ड्रममुळे महिलांचा डोईवरील भार खांद्यावर आला आहे. ड्रमच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणणे काहीसे सोपे झाले आहे तरीही त्यांच्या नशिबाची पायपीट काही कमी झाली नाही. रात्र जागून पिण्यासाठी पाणी आणणे नित्याचेच  झाले आहे. केवळ मोलमजुरीवर आपली उपजीविका करणाऱ्या या आदिवासींना दिवसरात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना रोजगार बुडत असून, त्याचा परिणाम उदरनिर्वाहावर होत आहे. खेदाची बाब म्हणजे पावसाळी दिवसातही ओढ्या-नाल्यात खड्डे खोदून त्यातील पाणी भरून आणावे लागते किंवा छताच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन  गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.ऑक्टोबर महिन्यापासूनच येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील कूपनलिका व  विहिरीही कोरड्या पडत असल्याने येथील महिलांना  एक-दोन किलोमीटरवर असलेल्या बांगरवाडी, चाफेवाडी येथील नदी-नाल्यातून  पाणी आणावे लागत आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी वारंवार शासनदरबारी पाणीटंचाईमुक्तीसाठी निवेदने दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल  घेतली जात नसल्याने पाणीटंचाई समस्या कायम असल्याची  येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKarjatकर्जत