शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कर्जतच्या ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 01:22 IST

शासनाची पाणी योजना अद्याप पोहोचलीच नाही; आदिवासींचे हाल

ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही.

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धाब्याचीवाडी या आदिवासी बांधवांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तेथील महिलांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण करावी लागत आहे. शासनाच्या पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने मैलोन‌्मैल पायपीट करून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या आदिवासी वस्तीत सुमारे ३०  कुटुंब राहातात. १७५ लोकसंख्या असलेल्या या आदिवासी वस्तीवर आजतागायत पाण्याची एकही योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेली नाही. काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आल्या; मात्र त्याही पाणीच नसल्याने बिनकामाच्या ठरत आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या पाणी वाहतुकीच्या फिरत्या ड्रममुळे महिलांचा डोईवरील भार खांद्यावर आला आहे. ड्रमच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणणे काहीसे सोपे झाले आहे तरीही त्यांच्या नशिबाची पायपीट काही कमी झाली नाही. रात्र जागून पिण्यासाठी पाणी आणणे नित्याचेच  झाले आहे. केवळ मोलमजुरीवर आपली उपजीविका करणाऱ्या या आदिवासींना दिवसरात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना रोजगार बुडत असून, त्याचा परिणाम उदरनिर्वाहावर होत आहे. खेदाची बाब म्हणजे पावसाळी दिवसातही ओढ्या-नाल्यात खड्डे खोदून त्यातील पाणी भरून आणावे लागते किंवा छताच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन  गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे.ऑक्टोबर महिन्यापासूनच येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील कूपनलिका व  विहिरीही कोरड्या पडत असल्याने येथील महिलांना  एक-दोन किलोमीटरवर असलेल्या बांगरवाडी, चाफेवाडी येथील नदी-नाल्यातून  पाणी आणावे लागत आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी वारंवार शासनदरबारी पाणीटंचाईमुक्तीसाठी निवेदने दिले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल  घेतली जात नसल्याने पाणीटंचाई समस्या कायम असल्याची  येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईKarjatकर्जत