शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धोकादायक इमारतीची भिंत कोसळली; ‘नैना’ क्षेत्रातील पुनर्बांधणीचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:32 IST

सुकापूरमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

पनवेल : ‘नैना’ क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुकापूर येथील युगांतक कॉम्प्लेक्समधील अवंतिका सोसायटीतील एच २ या इमारतीची भिंत गुरुवारी रात्री ६.३०च्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेनंतर ‘नैना’ क्षेत्रातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

१९९४ मध्ये उभारण्यात आलेली ही इमारत सुकापूर ग्रामपंचायतीने धोकादायक घोषित केली आहे. एच २ व एच ३ अशा दोन इमारती या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. त्यापैकी एच २ मधील दुसºया माळ्यावरील भिंत कोसळली. इमारतीत एकूण १२ फ्लॅट आहेत. संबंधित इमारत जीर्ण झाल्याने येथील रहिवासी स्थलांतरित झाले आहेत. मात्र, अद्यापही कॉम्पलेक्सच्या एच ३ या बिल्डिंगमध्ये २४ फ्लॅटधारक वास्तव्य करीत आहेत.

ग्रामपंचायत दरवर्षी धोकादायक घरे खाली करण्याच्या नोटीस बजावते. मात्र, घरे खाली करून जाणार कुठे? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. ‘नैना’ क्षेत्रातील जाचक अटी, केवळ एकाच चटईक्षेत्रामुळे या इमारतींच्या पुनर्बांधणीला विकासक पुढे येत नसल्याने रहिवासी द्विधा मनस्थितीत आहेत. सिडकोने धोकादायक इमारतीसंदर्भात धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे मत येथील रहिवासी पराग कदम यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही पदरी निराशाच पडत असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली.

१०० पेक्षा जास्त इमारती धोकादायक : सिडकोचे ‘नैना’ क्षेत्र खूप मोठे आहे. या क्षेत्रात १०० पेक्षा जास्त धोकादायक इमारतींचा समावेश आहे. जीर्ण इमारतीच्या पुनर्वसनाचे धोरण अद्याप स्पष्ट नसल्याने बहुसंख्य रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सिडकोने पुनर्विकासाबाबत धोरण निश्चित न केल्यास भविष्यात धोकायदाक इमारतींचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. यात जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाNavi Mumbaiनवी मुंबई