शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शेतकऱ्यांना प्रतीक्षा मोबदल्याची

By admin | Updated: December 10, 2015 02:00 IST

महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे इतरही शेतीला दरवर्षी नुकसान होत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे फक्त तुडील विभागातच शासनाकडून करण्यात आले असून दासगाव विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा अद्याप नुकसानभरपाईमध्ये विचार न केल्याने या विभागातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दासगाव विभागातील शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात रायगड जिल्हा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असल्याची माहिती अध्यक्ष तुकाराम शंकर देशमुख यांनी दिली आहे. २२ वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. येथील कारखान्यातून घातक सांडपाणी थेट सावित्री खाडीत सोडण्यात येत होते. या घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी तुडील आणि दासगाव मधील शेतजमीन नापीक झाली. शेती नापीक होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती ओसाड पडली आहे. २०१० व त्यानंतर खाडीपट्टीतील तुडील विभागातील सात गावातील शेतकऱ्यांचे उधाणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे महाड महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती यांनी संयुक्त केले होते. त्यावेळी महाड औद्योगिक वसाहतीकडे नुकसानीची मागणीही केली होती, मात्र दासगावच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत.खाडीलगतच्या दोन्ही बाजूतील शेती रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २०१० मध्ये व त्यानंतर शासनाकडून फक्त तुडील विभागातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी दासगाव ते दाभोळ याही विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या केमिकल्सच्या पाण्यामुळे दासगाव विभागातील ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे. - टी.एस.देशमुख, रायगड, जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष.