शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रतीक्षा मोबदल्याची

By admin | Updated: December 10, 2015 02:00 IST

महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे इतरही शेतीला दरवर्षी नुकसान होत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे फक्त तुडील विभागातच शासनाकडून करण्यात आले असून दासगाव विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा अद्याप नुकसानभरपाईमध्ये विचार न केल्याने या विभागातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दासगाव विभागातील शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात रायगड जिल्हा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असल्याची माहिती अध्यक्ष तुकाराम शंकर देशमुख यांनी दिली आहे. २२ वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. येथील कारखान्यातून घातक सांडपाणी थेट सावित्री खाडीत सोडण्यात येत होते. या घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी तुडील आणि दासगाव मधील शेतजमीन नापीक झाली. शेती नापीक होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती ओसाड पडली आहे. २०१० व त्यानंतर खाडीपट्टीतील तुडील विभागातील सात गावातील शेतकऱ्यांचे उधाणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे महाड महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती यांनी संयुक्त केले होते. त्यावेळी महाड औद्योगिक वसाहतीकडे नुकसानीची मागणीही केली होती, मात्र दासगावच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत.खाडीलगतच्या दोन्ही बाजूतील शेती रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २०१० मध्ये व त्यानंतर शासनाकडून फक्त तुडील विभागातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी दासगाव ते दाभोळ याही विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या केमिकल्सच्या पाण्यामुळे दासगाव विभागातील ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे. - टी.एस.देशमुख, रायगड, जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष.