शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

शेतकऱ्यांना प्रतीक्षा मोबदल्याची

By admin | Updated: December 10, 2015 02:00 IST

महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे इतरही शेतीला दरवर्षी नुकसान होत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे फक्त तुडील विभागातच शासनाकडून करण्यात आले असून दासगाव विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा अद्याप नुकसानभरपाईमध्ये विचार न केल्याने या विभागातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दासगाव विभागातील शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात रायगड जिल्हा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असल्याची माहिती अध्यक्ष तुकाराम शंकर देशमुख यांनी दिली आहे. २२ वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. येथील कारखान्यातून घातक सांडपाणी थेट सावित्री खाडीत सोडण्यात येत होते. या घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी तुडील आणि दासगाव मधील शेतजमीन नापीक झाली. शेती नापीक होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती ओसाड पडली आहे. २०१० व त्यानंतर खाडीपट्टीतील तुडील विभागातील सात गावातील शेतकऱ्यांचे उधाणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे महाड महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती यांनी संयुक्त केले होते. त्यावेळी महाड औद्योगिक वसाहतीकडे नुकसानीची मागणीही केली होती, मात्र दासगावच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत.खाडीलगतच्या दोन्ही बाजूतील शेती रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २०१० मध्ये व त्यानंतर शासनाकडून फक्त तुडील विभागातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी दासगाव ते दाभोळ याही विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या केमिकल्सच्या पाण्यामुळे दासगाव विभागातील ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे. - टी.एस.देशमुख, रायगड, जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष.