शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या हक्कासाठी दीड कोटी गेले वाया

By admin | Updated: February 25, 2017 03:15 IST

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १० लाख ३८ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; परंतु उर्वरित चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी मतदानाला चक्क दांडी मारली.

आविष्कार देसाई ,  अलिबागरायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १० लाख ३८ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; परंतु उर्वरित चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी मतदानाला चक्क दांडी मारली. त्यामुळे त्यांच्यासाठी मतदान प्रक्रियेवर होणारा प्रत्येकी ४० रुपयांप्रमाणे एक कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविले. मात्र, मतदारांनी त्यांच्या आवाहनला न जुमानल्याने प्रशासानाला आता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल १४ लाख ६२ हजार ८९५ मतदार आहेत. त्यामध्ये सात लाख ३७ हजार १०४ महिला मतदार, तर सात लाख २५ हजार ७९० पुरुष मतदारांचा समावेश आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी सरकार, निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असते. मतदारांना जागृत करण्यासाठी विविध कार्यशाळा, पथनाट्य, मोठमोठे होर्डिंग्ज अशा विविध स्तरांतून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी प्रत्येक मतदारांसाठी ४० रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला होता. त्याप्रमाणे पाच कोटी ८५ लाख १५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये १० लाख ८० हजार २७० मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी चक्क मतदानाला दांडी मारली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी एक कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च वाया गेल्यातच जमा आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत सुमारे एक लाख मतदारांना विविध कारणांनी मतदान करता न आल्याने त्यांनी प्रचंड हल्लाबोल केला होता. रायगडातील मतदारांनी मतदानाकडे का पाठ फिरवली याची कारणे प्रशासनाला अभ्यासावी लागणार आहेत. अन्यथा, कोट्यवधी रुपयांच्या निधीचा असाच अपव्यय सुरू राहील.१कार्लेखिंड : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांना आपले मत न देता नोटाचा मोठ्या प्रमाणावर वापर के ल्याचे दिसतआहे. रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०१७ चा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये शेकाप प्रथम क्रमांक तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर विजयी झाली. २अलिबाग मतदार संघातून जिल्हा परिषदेसाठी शेकापला आठ जागा तर शिवसेनेला तीन जागा, काँग्रेस पक्षाला दोन जागा आणि भाजपाला एक जागा मिळाली. लागलेल्या कौलप्रमाणे शेकाप, शिवसेना या दोन पक्षांच्या जागा वाढल्या; परंतु काँग्रेस पक्षाला कच खावी लागली. या निवडणुकांमध्ये अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १,५४,०८१ मतदान झाले तर पंचायत समितीसाठी १,३५,८४९ इतके मतदान झाले आहे. ३असे असले तरी मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना नापसंती देत नोटाचा आकडा वाढला आहे. पंचायत समितीसाठी ३२१९ आणि जिल्हा परिषदेसाठी ३४२५ इतक्या मतदारांनी आपल्या मतदानातून उमेदवारांवर नाराजी व्यक्त के ली आहे.