शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मतदार याद्यांमधील घोळ कायम; बोगस मतदानाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:53 IST

दुबार नोंदणी वगळण्याकडे होतेय दुर्लक्ष; अर्ज करूनही दुरूस्ती नाही

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : मतदारांकडून नावातील दुरुस्तीसाठी अर्ज करूनही मतदार याद्यांमधील घोळ अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. यादींमध्ये छापील नावात अनेक त्रुटी असल्याने मतदारांना स्वत:चे नाव ओळखण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागत आहे. तर मयत व्यक्तीची व दुबार नोंदणी असलेली नावे वगळण्याचे अर्ज प्राप्त होऊनही ती वगळली जात नसल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यानंतर पुढील वर्षभरात विधानसभा व महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मतदानासाठी सज्ज होण्याची तयारी मतदारांकडून सुरू आहे. तर निवडणूक विभागाकडून देखील नव्या मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्षानुवर्षे मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या चुकांचा फटका नव्या तसेच जुन्या मतदारांना बसत आहे. मतदार याद्यांमधील नावासह पत्त्यामध्ये अनेक त्रुटी आढळत असून त्या सुधारण्यासाठी मतदारांकडून निवडणूक विभागाकडे तक्रार अर्जांचा पाऊस पाडला जात आहे. त्यानंतरही यादींमधील त्रुटी सुधारण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे मतदार यादीशी संबंधित संपूर्ण यंत्रणेच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर निवडणूक विभागाची आॅनलाइन नोंदणी व दुरुस्ती प्रक्रिया केवळ नावापुरतीच ठरत आहे. आॅनलाइन अर्ज व कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही तीच कागदपत्रे प्रत्यक्षात जमा करण्यासाठी निवडणूक विभागाच्या कार्यालयात बोलवले जात आहे. परंतु एकदा कागदपत्रे जमा करूनही अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने नागरिकांची नाव नोंदणीसह दुरुस्तीसाठी पायपीट होतच आहे. यानंतरही एखाद्याच्या नावाची नोंदणी झाल्यास छापील यादीतील त्रुटींमुळे त्यांना स्वत:चे नाव ओळखण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागत आहे. काहींच्या नावांमध्ये छापील त्रुटीमुळे अर्थाचा अनर्थ होत आहे, तर काही कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या यादीत विभागली गेली आहेत. यामुळे त्यांचे मतदानाचे केंद्रही बदलले गेले आहेत. मात्र, अर्ज भरून देताना त्यामध्ये रहिवासी सोसायटीचे नाव व पत्ता योग्यरीत्या लिहिलेला असतानाही, नाव नोंदणीवेळी मतदार यादीत तो बदलतो कसा, असा प्रश्न मतदारांना वर्षानुवर्षे पडत आहे. ओळखपत्रातील चुकांमुळे त्याचा वापर करताना समस्या अधिक वाढवण्यासारखे ठरत आहे.चुकीच्या पत्त्यांमुळे कुटुंबे विभागलीमतदारांकडून अर्ज भरताना पुरेपूर खबरदारी घेतली जात असतानाही मतदानयादीत नावाचा समावेश होताना त्यांचे पत्ते बदलल्याचा प्रकार पाहायला मिळतो. या मागच्या नेमक्या कारणांबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, अशा त्रुटींमुळे एकाच कुटुंबातील व्यक्ती कागदोपत्री विभागली जात असून, शासकीय प्रक्रिये वेळी संबंधिताला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.मयत व्यक्तीही यादीत जिवंतनेरुळ येथील सिद्धेश्वर तुकाराम वरपे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानुसार मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्याचे अनेक अर्ज त्यांच्या नातेवाइकांनी केले आहेत. त्यानंतरही वर्षानुवर्षे याद्या अद्ययावत होत असतानाही त्यासोबत मयत व्यक्तींनाही मतदार यादीत जिवंत ठेवण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून होत आहे.आॅनलाइन नोंदणीची प्रक्रियाही आॅफलाइनमतदारांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक विभागाने आॅनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. मात्र, संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज केल्यानंतरही चार ते पाच महिन्यांनी निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याचे ईमेलद्वारे कळवले जाते. तर ती जमा केल्यानंतरही वेळेवर अर्ज निकाली निघत नसल्याने मतदारांसाठी आॅनलाइन प्रक्रियाही गैरसोयीची ठरत आहे.लोकप्रतिनिधींच्या शिफारसींनाच प्राधान्यमतदारयादीत नावनोंदणीसाठी प्रत्यक्ष अर्ज करूनही अनेकदा नागरिकांना अपयश येते. मात्र, लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पदाधिकाऱ्यामार्फत ही प्रक्रिया केल्यास विनाअडथळा नावाची नोंदणी केली जाते. यामुळे मतदार नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी लोकप्रतिनिधींच्याच इशाऱ्यावर काम करतात का? असा प्रश्नही निर्माण होत आहे.मागील काही वर्षांत अनेकांची शहरांतर्गत वास्तव्याची ठिकाणे बदलली आहेत. त्यापैकी अनेकांनी वास्तव्याच्या पूर्वीच्या ठिकाणची मतदार नोंदणी वगळून नव्या नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र, वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही त्यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. तर मागील दहा वर्षांत कोपरखैरणेतील माथाडी कामगारांची अनेक कुटुंबे घणसोलीला स्थलांतरित झाली आहेत. त्यांच्याकडूनही जुनी नावे वगळण्याचे करण्यात आलेले अर्ज निवडणूक विभागाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यामुळे शहरात दुबार मतदारांच्या नोंदणीची संख्या वाढतच चालली असून, शिवाय अशा ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई