शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आरटीओच्या आवारात आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:57 IST

राजकीय फलकांना अभय : वाहनांवरील राजकीय चिन्हेही तशीच

सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आचारसंहिता घोषित होऊन महिना उलटला तरी आरटीओ कार्यालयाच्या आवारात आचारसंहितेचा भंग सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी अनेक राजकीय संघटनांची कार्यालये असून त्यांनी लावलेले फलक अद्याप झाकण्यात आलेले नाही. शिवाय वाहनांवरही राजकीय पक्षांचे स्टीकर दिसत असून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने शहरात आचारसंहिता लागू आहे. १० मार्चला ही आचारसंहिता घोषित झाली आहे. त्यानंतर २४ तासांत शहरातील राजकीय फलक, वाहनांवरील राजकीय पदांच्या पाट्या तसेच स्टिकर हटवणे आवश्यक होते. मात्र, महिना उलटून गेला तरी आरटीओ कार्यालयाच्या आवारात आचारसंहितेचा भंग होताना दिसून येत आहे.

एपीएमसीमधील धान्य मार्केटमध्ये भाडोत्री जागेत आरटीओचे कार्यालय आहे. त्याच ठिकाणी राजकीय पक्षांच्या वाहतूक संघटनांची, तसेच एजंटची कार्यालये आहेत, यामुळे त्या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. त्या सर्वांना नजरेस पडेल अशा ठिकाणी राजकीय संघटनांचे फलक लावलेले आहेत. मात्र, शहरात आचारसंहिता लागू असल्याने हे फलक हटवणे अथवा झाकणे आवश्यक असतानाही संबंधितांकडून त्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्याशिवाय आरटीओ कार्यालयात येणाºया वाहनांवरही राजकीय पक्षाच्या चिन्हांचे स्टिकर पाहायला मिळत आहेत.

संबंधित राजकीय पक्षाचा कट्टर कार्यकर्ता सिद्ध करण्यासाठी अनेकदा कार्यकर्त्यांचा आटापिटा सुरू असतो, याकरिता वाहनांच्या काचेवर पुढे अथवा मागे नेत्याचे फोटो छापणे, नंबरप्लेटवर पक्षाच्या चिन्हाचे स्टिकर लावणे, असे प्रकार सुरू असतात. तसेच पक्षात छोटे-मोठे पद असल्यास त्याची पाटी बनवून ती वाहनावर लावली जाते. मात्र, अशा राजकीय पाट्या, स्टिकर हे आचारसंहिता काळात झाकल्या जाणे आवश्यक असते. यानंतरही पोलीस अथवा निवडणूक विभागाच्या कारवाईची भीती राहिलेली नसल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. सद्यस्थितीला शहरात अशा प्रकारची वाहने मोठ्या संख्येने रस्त्यांवर फिरत आहेत. त्यापैकी काही वाहने आरटीओ आवारातही उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात आचारसंहितेचा भंग होत असल्यास तक्रारीसाठी पोलिसांनी ९३७२४१९७९९ हा हेल्पलाइन नंबर सुरू केलेला आहे. तर निवडणूक विभागाने ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी एकूण १६ पथके तयार केली आहेत. त्यामध्ये आठ स्थायी व आठ भरारी पथकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे.मागील काही महिन्यांत पालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये पदपथांभोवती रेलिंग बसवण्याची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. ही कामे आपल्याच मागणीनुसार अथवा निधीतून झाल्याचे दाखवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यावर स्वत:ची नावे लिहिण्यात आली आहेत. तीदेखील झाकली जाणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.