शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आरटीओच्या आवारात आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:57 IST

राजकीय फलकांना अभय : वाहनांवरील राजकीय चिन्हेही तशीच

सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आचारसंहिता घोषित होऊन महिना उलटला तरी आरटीओ कार्यालयाच्या आवारात आचारसंहितेचा भंग सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी अनेक राजकीय संघटनांची कार्यालये असून त्यांनी लावलेले फलक अद्याप झाकण्यात आलेले नाही. शिवाय वाहनांवरही राजकीय पक्षांचे स्टीकर दिसत असून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने शहरात आचारसंहिता लागू आहे. १० मार्चला ही आचारसंहिता घोषित झाली आहे. त्यानंतर २४ तासांत शहरातील राजकीय फलक, वाहनांवरील राजकीय पदांच्या पाट्या तसेच स्टिकर हटवणे आवश्यक होते. मात्र, महिना उलटून गेला तरी आरटीओ कार्यालयाच्या आवारात आचारसंहितेचा भंग होताना दिसून येत आहे.

एपीएमसीमधील धान्य मार्केटमध्ये भाडोत्री जागेत आरटीओचे कार्यालय आहे. त्याच ठिकाणी राजकीय पक्षांच्या वाहतूक संघटनांची, तसेच एजंटची कार्यालये आहेत, यामुळे त्या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. त्या सर्वांना नजरेस पडेल अशा ठिकाणी राजकीय संघटनांचे फलक लावलेले आहेत. मात्र, शहरात आचारसंहिता लागू असल्याने हे फलक हटवणे अथवा झाकणे आवश्यक असतानाही संबंधितांकडून त्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्याशिवाय आरटीओ कार्यालयात येणाºया वाहनांवरही राजकीय पक्षाच्या चिन्हांचे स्टिकर पाहायला मिळत आहेत.

संबंधित राजकीय पक्षाचा कट्टर कार्यकर्ता सिद्ध करण्यासाठी अनेकदा कार्यकर्त्यांचा आटापिटा सुरू असतो, याकरिता वाहनांच्या काचेवर पुढे अथवा मागे नेत्याचे फोटो छापणे, नंबरप्लेटवर पक्षाच्या चिन्हाचे स्टिकर लावणे, असे प्रकार सुरू असतात. तसेच पक्षात छोटे-मोठे पद असल्यास त्याची पाटी बनवून ती वाहनावर लावली जाते. मात्र, अशा राजकीय पाट्या, स्टिकर हे आचारसंहिता काळात झाकल्या जाणे आवश्यक असते. यानंतरही पोलीस अथवा निवडणूक विभागाच्या कारवाईची भीती राहिलेली नसल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. सद्यस्थितीला शहरात अशा प्रकारची वाहने मोठ्या संख्येने रस्त्यांवर फिरत आहेत. त्यापैकी काही वाहने आरटीओ आवारातही उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात आचारसंहितेचा भंग होत असल्यास तक्रारीसाठी पोलिसांनी ९३७२४१९७९९ हा हेल्पलाइन नंबर सुरू केलेला आहे. तर निवडणूक विभागाने ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी एकूण १६ पथके तयार केली आहेत. त्यामध्ये आठ स्थायी व आठ भरारी पथकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ठोस कारवाई होणे अपेक्षित आहे.मागील काही महिन्यांत पालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये पदपथांभोवती रेलिंग बसवण्याची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. ही कामे आपल्याच मागणीनुसार अथवा निधीतून झाल्याचे दाखवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यावर स्वत:ची नावे लिहिण्यात आली आहेत. तीदेखील झाकली जाणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.