शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:41 IST

सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या स्लॅबचा भाग कोसळून रोज अपघात होत असून रहिवासी जीव मुठीत घेवून वास्तव्य करत

- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या स्लॅबचा भाग कोसळून रोज अपघात होत असून रहिवासी जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये छताचा भाग कोसळून बनुबाई लोंढे (वय ९०) या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होवून पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एव्हरग्रीन सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या आशा साबळे यांच्या घरामध्ये १६ जुलैला पहाटे सहा वाजता स्लॅबचा काही भाग कोसळला. छताचे प्लास्टर आशा यांच्या आई बनुबाई लोंढे यांच्या छातीवर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला सायनमधील लोकमान्य टिळक रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसामध्ये एव्हरग्रीन सोसायटीमध्ये चार ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळले आहे. या शेजारी असलेल्या दत्तकृपा सोसायटीही धोकादायक घोषित करण्यात आली आहे. दत्तकृपाची स्थिती एव्हरग्रीनपेक्षा गंभीर असून तेथे छताच्या प्लास्टरबरोबर जीनेही निखळू लागले आहेत. दत्तकृपा यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली आहे.परंतु अद्याप तिच्या पुनर्बांधणीला परवानगी देण्यात आलेली नाही. नेरूळ सेक्टर २४ मधील स्वागत गृहनिर्माण सोसायटीमध्येही दोन दिवसांपूर्वी स्लॅबचा काही भाग कोसळला असून वाशीमधील एकता सोसायटीमध्ये स्लॅबचा भाग कोसळून एक जखमी झाला आहे. महानगरपालिकेने शहरातील ३१५ बांधकामे धोकादायक घोषित केली आहेत. धोकादायक बांधकामांमध्ये सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचाही समावेश आहे. सीवूड, नेरूळ, वाशी, तुर्भे परिसरामधील जुन्या इमारती जर्जर झाल्या असून इमारतींच्या स्लॅबचा भाग वारंवार कोसळू लागला आहे. स्लॅब कोसळून आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. अनेकांनी स्वत:ची हक्काची घरे सोडून दुसरीकडे भाडेतत्त्वावर घरे घेवून राहण्यास सुरवात केली आहे. ज्यांना पर्याय नाही ते मोडकळीस आलेल्या इमारतीमध्येच जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. प्रत्येक सूर्योदयाबरोबर या रहिवाशांना पुनर्जन्म झाल्याचा अनुभव येवू लागला आहे. पावसाळ्यात कधी कोणती इमारत कोसळेल व प्राणाला मुकावे लागेल याची खात्री राहिलेली नाही. जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वीच अडीच एफएसआय मंजूर केला आहे. परंतु सिडको व महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप एकाही इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळालेली नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. पालिकेला किती बळी हवे आहेत?महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची नावे जाहीर करत असते. रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी नोटीस दिली जात असून अनेकांची नळजोडणीही खंडित केली आहे. घरे खाली करण्यास भाग पाडणारी पालिका पुनर्बांधणीसाठी मात्र परवानगी देत नसून अजून किती बळी गेल्यानंतरही प्रशासन जागे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रहिवासी भयभीतधोकादायक इमारतीमधील रहिवासी जीव मुठीत घेवून जगत आहेत. परंतु आतापर्यंत कधीही कोणाचा मृत्यू झाला नव्हता. एव्हरग्रीन सोसायटीमधील घटनेनंतर धोकादायक इमारतीमधील रहिवासी भयभीत झाले आहेत. पाऊस सुरू झाला की इमारत कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांच्या पोटात गोळा येवू लागला आहे. एव्हरग्रीन सोसायटीमध्ये आतापर्यंत चार ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे स्लॅब कोसळून बनुबाई लोंढे जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शासन व प्रशासनाने जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीविषयी ठोस भूमिका घ्यावी. - महादेव पवार, सामाजिक कार्यकर्ते, नेरूळ