शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कामोठे वसाहतीत गटारावरील झाकणे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:15 IST

सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात होण्याची वाढली शक्यता

कळंबोली : कामोठे वसाहतीत पावसाळी गटारावरील झाकणे गायब झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडतात. सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी काही बोलत नसल्याचा आरोप शेकापचे सचिन गायकवाड यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत या बाबत कार्यवाही करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कामोठे वसाहतीत नियमाप्रमाणे प्रत्येक रस्त्याच्या बाजूला आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, या उद्देशाने बांधण्यात आलेल्या या गटारांची मान्सूनपूर्व साफसफाई केली जाते. त्याकरिता चेंबर काढण्यात आली आहेत आणि त्यावरील झाकणे मात्र गायब झाली आहेत. त्यामुळे पदपथावर चालणारे अनेक पादचारी रात्रीच्या वेळी त्या गटारांमध्ये पडतात. अनेकदा भटकी जनावरेही त्यामध्ये गेल्याची उदाहरणे आहेत. तीन दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ नागरिकही अशा प्रकारे जखमी झाले. खांदेश्वर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ३० पेक्षा जास्त झाकणे गायब झाली आहेत.कामोठे नोडमध्ये काही ठिकाणची झाकणे गायब झाल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, त्यानुसार सेक्टरनिहाय पाहणी करून, ज्या-ज्या ठिकाणी झाकणे नाहीत, तिथे झाकणे टाकून पदपथ सुरक्षित करण्यात येतील.- शिलरत्न जगताप,सहायक कार्यकारी अभियंता,सिडको, कामोठे

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई