शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र!

By नारायण जाधव | Updated: May 10, 2023 17:01 IST

मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसई आरटीओ कार्यालयांसह राज्यातील २० आरटीओच्या कार्यक्षेत्रात वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र सुरू करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सूचनेनुसार ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील आरटीओंची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. 

हे आहेत ते २० आरटीओ ज्या २० आरटीओंच्या कार्यालय अंतर्गत या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांना मान्यता दिली आहे, त्यामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, साांगली, अकलूज, गडचिरोली, कराड, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, सिंधुदुर्ग, नागपूर (पूर्व) यांचाही समावेश आहे.

काय आहे वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र?दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसणे हेदेखील अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी अत्यंत काटेकोरपणे करणे तितकेच महत्त्वपूर्ण असते. यामुळे स्वयंचलित यंत्रणेमार्फत गाड्यांची तपासणी या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रांत करणे सोपे होणार आहे.

यांची होते तपासणीफिटनेस चाचणीमध्ये गाडीचे ब्रेक, टायर, इंजिन,लाइट, आदींची संपूर्ण तपासणी करण्यात येते. त्यासाठी टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिले जात असून ती व्यवस्थित असल्यास आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते. चाचणीच्या वेळी गाडीमध्ये काही दोष आढळल्यास वाहनचालकाला गाडीची पुन्हा फिटनेस चाचणी करावी लागते.

न्यायालयाने टोचले होते कानफिटनेस चाचणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. वाढत्या रस्ते अपघाताला विविध कारणे असले तरी गाडी सुस्थितीत नसणे, हेदेखील अपघात घडण्यामागचे महत्त्वाचे कारण असून आजही रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. त्यानंतर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यात ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबई