शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नाल्याशेजारी भाजीपाला, फळांची होतेय विक्री, कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:51 IST

नवी मुंबई : बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.

नवी मुंबई : बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी असलेला नाला आणि भूखंडाशेजारी डम्पिंग केले जात असल्याने हा परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. अशा अस्वच्छ ठिकाणी दररोज भाजीपाला, तसेच फळांची विक्री केली जाते. या ठिकाणी असलेल्या वाहनतळाच्या जागेवरही फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे चित्र पाहायला मिळते.कोकणभवन, सिडको तसेच बेलापूर रेल्वेस्थानक परिसरात दिवसाला शेकडो नागरिक ये-जा करत असतात. नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या कोकण भवन परिसरात परगावाहून कामानिमित्त येणाºया नागरिकांनाही या फेरीवाल्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सकाळी कार्यालयीन वेळेत या परिसरातून मार्ग काढणे मुश्कील असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. उघड्या नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नाकाला रुमाल लावून मार्ग काढण्याशिवाय पर्याय उरत नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी मालती पांचाळ यांनी व्यक्त केली. संध्याकाळच्या वेळी या परिसरात मासळी विक्रेत्यांकडून जागेची अडवणूक केली जाते. अतिक्रमणावर ठोस कारवाई होत नसल्याने निर्भयपणे जागेचा वापर केल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक विक्रेत्यांनी या ठिकाणी उघड्यावर हॉटेल थाटले असून, पार्किंगच्या जागेवर खुर्च्या आणि टेबल मांडले आहेत. परिसरात माशांचे प्रमाण वाढले असून, विक्रेते या ठिकाणीच कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिले जात असून, नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे या परिसरातील समस्यांची वाढ होत आहे. भाजी, फळविक्रेत्यांवर पालिकेची ठोस कारवाई होत नसल्याने फेरीवाले सर्रासपणे या ठिकाणी बस्तान मांडत असल्याचा प्रकार पाहायला मिळतो. सर्वसामान्य नागरिक, तसेच प्रवाशांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असताना, या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांना अभय का दिले जात आहे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामानिमित्त येणाºया नागरिकांना या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसून, या पार्किंगच्या जागेवरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे.ठोस कारवाई न केल्याने दुसºया दिवशी पुन्हा या ठिकाणी व्यवसाय करण्याचे धाडस या फेरीवाल्यांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असून, पदपथावरील जागेवरही या फेरीवाल्यांनी जागा अडविली आहे.ऐन कार्यालयीन वेळेतही या ठिकाणी पदपथावर असलेल्या विक्रेत्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी.