ठाणे : जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खराब झाल्यामुळे आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात १५० रुपये किलोने मिळणारी मटार २०० रुपये किलोने मिळत आहे. तर, ५० रुपये किलोने मिळणारा फ्लॉवर ६० रुपयाने मिळत आहे. या सर्व भाज्या नाशिक व पुणे येथून वाशीच्या एपीएमसी तसेच कल्याण एपीएमसीत आणल्या जात आहेत. त्यातच ती खराब झालेली असल्यामुळे चांगली भाजी किरकोळ बाजारात येईपर्यंत अधिक महाग होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यातच सध्या विशेष अशा कुठल्याच भाजीचा मोसम नसल्यामुळे आजकाल सगळ्या भाज्या बाराही महिने उपलब्ध असतात. कारली, शिराळी, पडवळ या भाज्यांचा मोसम असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. परंतु, मागील आठवड्यात ८० रुपये किलोने मिळणारी गवार मात्र या आठवड्यात ६० रुपये किलो झाली आहे.
भाज्या महागल्या, मटार २०० रुपये किलो
By admin | Updated: October 1, 2015 12:10 IST