शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वाशीत रिक्षाचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:02 IST

प्रवाशांना धरले वेठीस : कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

नवी मुंबई : बेशिस्त रिक्षाचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात वाशी रेल्वेस्थानक येथील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला होता, त्यामुळे काही वेळासाठी प्रवाशांची गैरसोय झाली होती. अखेर वाशी पोलीसठाण्यात झालेल्या बैठकीअंती रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले.

वाशी वाहतूक शाखेकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, लेनची शिस्त न पाळणे, चालक परवाना नसणे, अशा कारवाया केल्या जात आहेत; परंतु सतत होत असलेल्या या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावर आवश्यक ठिकाणी रिक्षा थांबे नाहीत, त्यामुळे रिक्षाचालकांना नाईलाजाने रस्त्यावर थांबावे लागत असल्याचेही रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष सुनील बोर्डे यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले; परंतु आरटीओ स्तरावर रखडलेल्या निर्णयांचा वाहतुकीवर परिणाम नको, अशी वाहतूक पोलिसांची भूमिका आहे. शिवाय, लोकप्रतिनिधींकडून देखील रस्त्यांवरील अवैध रिक्षा थांब्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम सतत राबवली जात असल्याचे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे असल्याने त्यांनी बुधवारी अचानक रिक्षा बंद आंदोलन केले. एप्रिल महिन्यातही याच युनियनने अशा प्रकारे कारवाई विरोधात भूमिका घेतली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी वाशी पोलीसठाण्यात बैठक घेण्यात आली. या वेळी रिक्षाचालकांनी रिक्षा थांबे नसणे, खड्ड्यांमुळे होणारे त्रास अशा समस्या मांडल्या. त्या निकाली लागेपर्यंत कारवाईचे स्वरूप तीव्र न करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात पुढील बैठकीपर्यंत कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंद मागे घेतला. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिक्षाचालकांवर यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांनीही रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईauto rickshawऑटो रिक्षा