शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाशीत रिक्षाचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:02 IST

प्रवाशांना धरले वेठीस : कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

नवी मुंबई : बेशिस्त रिक्षाचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात वाशी रेल्वेस्थानक येथील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला होता, त्यामुळे काही वेळासाठी प्रवाशांची गैरसोय झाली होती. अखेर वाशी पोलीसठाण्यात झालेल्या बैठकीअंती रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले.

वाशी वाहतूक शाखेकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, लेनची शिस्त न पाळणे, चालक परवाना नसणे, अशा कारवाया केल्या जात आहेत; परंतु सतत होत असलेल्या या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावर आवश्यक ठिकाणी रिक्षा थांबे नाहीत, त्यामुळे रिक्षाचालकांना नाईलाजाने रस्त्यावर थांबावे लागत असल्याचेही रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष सुनील बोर्डे यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले; परंतु आरटीओ स्तरावर रखडलेल्या निर्णयांचा वाहतुकीवर परिणाम नको, अशी वाहतूक पोलिसांची भूमिका आहे. शिवाय, लोकप्रतिनिधींकडून देखील रस्त्यांवरील अवैध रिक्षा थांब्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम सतत राबवली जात असल्याचे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे असल्याने त्यांनी बुधवारी अचानक रिक्षा बंद आंदोलन केले. एप्रिल महिन्यातही याच युनियनने अशा प्रकारे कारवाई विरोधात भूमिका घेतली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी वाशी पोलीसठाण्यात बैठक घेण्यात आली. या वेळी रिक्षाचालकांनी रिक्षा थांबे नसणे, खड्ड्यांमुळे होणारे त्रास अशा समस्या मांडल्या. त्या निकाली लागेपर्यंत कारवाईचे स्वरूप तीव्र न करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात पुढील बैठकीपर्यंत कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंद मागे घेतला. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिक्षाचालकांवर यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांनीही रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईauto rickshawऑटो रिक्षा