शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

वाशीत रिक्षाचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:02 IST

प्रवाशांना धरले वेठीस : कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

नवी मुंबई : बेशिस्त रिक्षाचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात वाशी रेल्वेस्थानक येथील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला होता, त्यामुळे काही वेळासाठी प्रवाशांची गैरसोय झाली होती. अखेर वाशी पोलीसठाण्यात झालेल्या बैठकीअंती रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले.

वाशी वाहतूक शाखेकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, लेनची शिस्त न पाळणे, चालक परवाना नसणे, अशा कारवाया केल्या जात आहेत; परंतु सतत होत असलेल्या या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावर आवश्यक ठिकाणी रिक्षा थांबे नाहीत, त्यामुळे रिक्षाचालकांना नाईलाजाने रस्त्यावर थांबावे लागत असल्याचेही रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष सुनील बोर्डे यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले; परंतु आरटीओ स्तरावर रखडलेल्या निर्णयांचा वाहतुकीवर परिणाम नको, अशी वाहतूक पोलिसांची भूमिका आहे. शिवाय, लोकप्रतिनिधींकडून देखील रस्त्यांवरील अवैध रिक्षा थांब्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम सतत राबवली जात असल्याचे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे असल्याने त्यांनी बुधवारी अचानक रिक्षा बंद आंदोलन केले. एप्रिल महिन्यातही याच युनियनने अशा प्रकारे कारवाई विरोधात भूमिका घेतली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी वाशी पोलीसठाण्यात बैठक घेण्यात आली. या वेळी रिक्षाचालकांनी रिक्षा थांबे नसणे, खड्ड्यांमुळे होणारे त्रास अशा समस्या मांडल्या. त्या निकाली लागेपर्यंत कारवाईचे स्वरूप तीव्र न करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात पुढील बैठकीपर्यंत कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंद मागे घेतला. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिक्षाचालकांवर यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांनीही रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईauto rickshawऑटो रिक्षा