शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या प्रक्रियेत वाहतूक सुविधांचा मोलाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:43 IST

आदित्य ठाकरे : वाशीत तीन दिवसीय प्रवासी दळणवळण परिषद

नवी मुंबई : कोणत्याही राज्याच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था आणि प्रवासी वाहतूक यंत्रणेचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यानुसार राज्य सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मागील काही काळात त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे, असे प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बीओसीआय या संस्थेच्या वतीने सुरक्षित, स्मार्ट आणि टिकाऊ प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देणारा अर्थात सेफ, स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेंबल पॅसेंजर मोबिलिटी या संकल्पनेवर आधारित दुसऱ्या प्रवासी-१९ या परिषदेचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाºया प्रवासी दळणवळण परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते व अन्य मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर दिला जात आहे. पुढील २० वर्षांत हे बदल दिसून येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवास हा उपक्रम या सर्व प्रयत्नांना प्रोत्साहन देणारा असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

सुरक्षित आणि सुखकर प्रवासाच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या सेवेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मिझोरामचे परिवहन राज्यमंत्री टी. जे. लालनुंतलोअंगा यांच्यासह विविध मोटर निर्मिती कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. आयोजन समितीचे सचिव जगदीश पाटणकर यांनी आपल्या प्रस्ताविक पर भाषणातून प्रवास-१९ या परिषदेचा हेतू विशद केला. तीन दिवस चालणाºया या परिषदेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या अनुषंगाने जुन्या आणि नव्या आधुनिक वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे