शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये शेतजमीन नापीक होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 23:23 IST

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांवर उरण परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे.

उरण : पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांवर उरण परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी थेट शेतजमिनीत घुसल्याने पूर्व भागातील शेकडो एकर शेतजमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.उरणमध्ये अनेक प्रकल्प, नवनवीन कंपन्या उभ्या राहत आहेत. या प्रकल्पांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीवर जाण्याचा रस्ताही बाधित केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कंबरभर पाण्यातून अथवा नाल्यातून वाट काढत शेतावर पोहोचावे लागत आहे. याबाबत तोडगा काढण्याबाबत शेतकºयांनी दोन वर्षांपूर्वी रायगडच्या जिल्हाधिकाºयांना पत्रही दिले होते. मात्र, अद्याप कोणताही मार्ग काढण्यात आला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.पावसाचे पाणी जाणाºया नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आल्याने पाण्याला वाट मिळेल तिथे ते साचते. परिणामी, शेतीच्या बांधांना मोठ्या प्रमाणात खांडी (भगदाड) पडत आहे. शिवाय उन्हाळ्यात काम केले तरी पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने बांध कमकुवत झाले आहेत. त्यामुळे शेतजमीन नापीक होण्याचा धोका बळावला आहे.उरणच्या पूर्व भागातील जमिनींवर भांडवलदारांचा डोळा आहे. मात्र, शेती विकण्यास तयार नसल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे. नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले असले तरी संबंधित प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते शेतजमिनीत घुसते आणि शेती नापीक होत आहे. शेती नापीक झाली की शेतकरी आपसूकच जमिनी विकतील अशा आशेवर भांडवलदार, दलाल आहेत.उरणच्या पूर्व भागात वसलेल्या एकाही प्रकल्पाने शेतीत जाण्यासाठी शेतकºयांना रस्ता सोडलेला नाही. प्रकल्पाच्या चारही बाजूनी किमान दहा फुटांचा रस्ता ठेवणे बंधनकारक असतानाही याबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा प्रकल्पांवर कारवाई करण्याबाबत महसूल खात्याचे अधिकारीही चालढकल करीत आहेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पाना परवानग्याच्या खिरापती वाटणाºया स्थानिक ग्रामपंचायतीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे, त्यामुळे शेती पाण्याखाली गेली असून शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.कृषी विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी निम्म्याहून अधिक शेतकºयांनी तक्रारी करणे गरजेचे असल्याचे कृषी अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे शेती करावी की तहसील कार्यालय, कृषी कार्यालयांत कागदी घोडे घेऊन नाचवावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.>नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने शेती पाण्यातसध्या खोपटे आणि पिरकोन गावाच्या मधोमध असलेली पारांगीखार येथील शेतजमीन अखेरची घटका मोजत आहे. येथील खाडीतील पाणी नाल्याच्या बांधालगत असलेल्या शेतीत घुसल्याने शेती नापीक झाली आहे. शिवाय बांधही अनेक ठिकाणी फुटला आहे.>पाणदिवे, पिरकोन गावापासून पाण्याचा प्रवाह वेगाने नाल्यात येतो. मात्र, नाल्यात झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे वाट मिळेल तिथून पाणी वाट काढते. शेतीचे बांध कमकुवत असल्याने खांडी फुटून पाणी शेतात घुसते. या प्रकाराबाबत परिसराची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.