शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ज्वालामुखीच्या तोंडावर उरण; रासायनिक प्रकल्प धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 17:36 IST

 जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण :  जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात अत्यंत घातक, धोकादायक, ज्वलनशील आणि विषारी पदार्थ, वायु,रसायनांची हाताळणी केली जाते.तसेच उरण परिसरात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस आदि प्रकल्पांचाही त्यामध्ये समावेश आहे.या रासायनिक प्रकल्पात वारंवार आग,घातक विषारी केमिकल गळतीच्या घटना घडत असतात.अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांकडे सर्वच अद्ययावत,स्वयंचलित  यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो.मात्र जेव्हा दुर्घटना घडते त्यावेळी कंपन्यांचे सर्वच दावे फोल ठरतात.यंत्रणा उघड्या पडतात.यामुळे हे रासायनिक प्रकल्प उरणकरांसाठी केव्हाही धोकादायक ठरू शकतात.हे उरणकरांनी वारंवार अनुभव घेतलेला आहे.सिध्दही झाले आहे.

 उरण परिसरातील हे रासायनिक प्रकल्पांची रासायनिक पदार्थ साठविण्याची क्षमता प्रचंड आहे.या रासायनिक प्रकल्पात आग, स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास रासायनिक प्रकल्पाच्या ३० किमी परिघातील परिसर बेचिराख होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्वालामुखीवर उरण असल्याची भीतीही या आधीच अनेक तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे.मात्र रासायनिक कंपन्या यातुन कोणताही बोध घेतल्यास तयार नाहीत.त्यामुळे रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाची २० लाख एलपीजी गॅस सिलिंडर साठवणुकीची क्षमता.अशा या मोठ्या प्रमाणावर साठवून क्षमता असलेल्या शुक्रवारी ओएनजीसी प्रकल्पात शुक्रवारी  (८ सप्टेंबर) घडलेली तेलगळतीची घटना उरणकरांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे.याआधीही प्रकल्पात आग, तेलगळतीची घटना घडल्या आहेत.तेल गळती वेळीच आटोक्यात आली नसती तर ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच असलेली अनेक गावे आणि लाखो रहिवाश्यांवर ऐन गणेशोत्सवातच गंडातर आले असते.

ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या आग आणि तेलगळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.बोकडवीरा येथील वायुविद्युत केंद्रातही मागील वर्षी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत एका अभियंत्यासह दोन कामगार मृत्यु पावले होते.दुदैवाने यांचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक ना शासनाला ना संबंधित विभागाच्या शासकीय यंत्रणेला आहे.ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते.