शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

ज्वालामुखीच्या तोंडावर उरण; रासायनिक प्रकल्प धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 17:36 IST

 जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण :  जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात अत्यंत घातक, धोकादायक, ज्वलनशील आणि विषारी पदार्थ, वायु,रसायनांची हाताळणी केली जाते.तसेच उरण परिसरात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस आदि प्रकल्पांचाही त्यामध्ये समावेश आहे.या रासायनिक प्रकल्पात वारंवार आग,घातक विषारी केमिकल गळतीच्या घटना घडत असतात.अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांकडे सर्वच अद्ययावत,स्वयंचलित  यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो.मात्र जेव्हा दुर्घटना घडते त्यावेळी कंपन्यांचे सर्वच दावे फोल ठरतात.यंत्रणा उघड्या पडतात.यामुळे हे रासायनिक प्रकल्प उरणकरांसाठी केव्हाही धोकादायक ठरू शकतात.हे उरणकरांनी वारंवार अनुभव घेतलेला आहे.सिध्दही झाले आहे.

 उरण परिसरातील हे रासायनिक प्रकल्पांची रासायनिक पदार्थ साठविण्याची क्षमता प्रचंड आहे.या रासायनिक प्रकल्पात आग, स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास रासायनिक प्रकल्पाच्या ३० किमी परिघातील परिसर बेचिराख होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्वालामुखीवर उरण असल्याची भीतीही या आधीच अनेक तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे.मात्र रासायनिक कंपन्या यातुन कोणताही बोध घेतल्यास तयार नाहीत.त्यामुळे रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाची २० लाख एलपीजी गॅस सिलिंडर साठवणुकीची क्षमता.अशा या मोठ्या प्रमाणावर साठवून क्षमता असलेल्या शुक्रवारी ओएनजीसी प्रकल्पात शुक्रवारी  (८ सप्टेंबर) घडलेली तेलगळतीची घटना उरणकरांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे.याआधीही प्रकल्पात आग, तेलगळतीची घटना घडल्या आहेत.तेल गळती वेळीच आटोक्यात आली नसती तर ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच असलेली अनेक गावे आणि लाखो रहिवाश्यांवर ऐन गणेशोत्सवातच गंडातर आले असते.

ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या आग आणि तेलगळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.बोकडवीरा येथील वायुविद्युत केंद्रातही मागील वर्षी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत एका अभियंत्यासह दोन कामगार मृत्यु पावले होते.दुदैवाने यांचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक ना शासनाला ना संबंधित विभागाच्या शासकीय यंत्रणेला आहे.ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते.