शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 23:59 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराला नवी मुंबईमधून ८४ हजार मतांची आघाडी मिळाली.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराला नवी मुंबईमधून ८४ हजार मतांची आघाडी मिळाली. याचा धसका राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी घेतला असून, पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील काही दिवसांमध्ये पक्षामध्ये उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नवी मुंबईच्या राजकारणावर अडीच दशकांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजीव नाईक यांचा ठाणे मतदारसंघातून पराभव झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांनाही पराभवास सामोरे जावे लागले. यानंतर २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत पक्षातील अनेक महत्त्वाच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याचा फटका निवडणुकीमध्ये बसला व स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता टिकवावी लागली. यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही राष्ट्रवादीच्या उमदेवाराला नवी मुंबईमधील मताधिक्य मिळाले नाही. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ४४, ३६३ व बेलापूरमधून ३९,७२४ मते मिळाली. मनपा क्षेत्रातून तब्बल ८४ हजार मतांची आघाडी शिवसेनेला मिळाली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधूनही सेनेलाच आघाडी मिळाली आहे. याचा धसका नगरसेवकांनी घेतला आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारले असून अशीच स्थिती राहिली तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळविणे अशक्य होईल, असे वाटू लागले आहे. गणेश नाईक यांनीच भारतीय जनता पक्षात जावे, अशी मागणी होऊ लागली होती; परंतु नाईक यांनी मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांनाही गप्प बसावे लागले.राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असला तरी नगरसेवक व पुढील महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवसेना व किंवा भाजपमध्ये जाण्याची ओढ लागली आहे. एक गट शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे. १३ नगरसेवकांचा दुसरा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. यामध्ये झोपडपट्टी परिसरात वर्चस्व असलेल्या एक मोठ्या पदाधिकाºयाचाही समावेश आहे.या नगरसेवकांनी बैठका सुरू केल्या असून, १५ आॅगस्टपर्यंत पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षांतराच्या चर्चेने नवी मुंबईमधील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये जाण्यास तयार असलेले १३ नगरसेवक कोण? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.>नाईकांच्या पक्षांतराचीही चर्चापाच वर्षांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही चर्चा वाढली. यानंतर नाईक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या वक्तव्याचा विरोधी अर्थ घेतला जात आहे. शेवटच्या क्षणी विरोधकांना धक्का देण्यात नाईक वाकबगार असून नगरसेवकांची नाराजी व पक्षांतराची चर्चा ही सुद्धा राजकीय खेळी असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.>राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फूट पडणार असल्याच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही. सर्व नगरसेवक व पदाधिकारी पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गुरुवारी महासभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीलाही नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडणे अशक्य आहे.- अनंत सुतार,जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस