शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
5
"१५ हजारांचा चाजनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
6
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
7
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
8
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
9
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
10
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
11
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
12
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
13
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
14
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
15
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
16
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
17
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
18
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
20
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:34 IST

पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे त्याचा तीन वर्षांनंतरही वापर सुरू झालेला नाही. या कारणाने कळंबोली-कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. बी.ओ.टी. तत्त्वावर सायन-पनवेल टोलवेज कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यानुसार २३ कि.मी. लांबीचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. परंतु बहुतांशी काम बाकी असताना शासनाने या कंपनीला टोल वसुली करण्यास परवानगी दिली. कळंबोली, कामोठे, पुरुषार्थ पेट्रोलपंप येथे बांधण्यात आलेले तीन सबवे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महामार्ग ओलांडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. टोल सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. आता हे मार्ग बांधून पूर्ण झाले असले तरी आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांकरिता हे भुयारी मार्ग खुले करण्यात आलेले नाहीत. यामुळे कळंबोली आणि कामोठे वसाहतीतून येणाऱ्या- जाणाºयांना महामार्ग क्र ॉस करावा लागत आहे. भरधाव वेगाने येणाºया वाहनांमुळे अनेकदा लहान- मोठे अपघात घडतात, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. भुयारी मार्ग पाण्यात बुडून ठेवले आहेत त्याबाबत हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे सायन-पनवेल टोलवेज कंपनी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून शासनाच्या नावाने खडे फोडत आहे. तीनही ठिकाणी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत. महामार्गालगत सर्व्हिस रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. या विरोधात आंदोलन झाले त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र तरीही कामोठे वसाहतीतून आजही मुंबई बाजूकडे जाता येत नाही. त्यासाठी दोन कि.मी. वळसा घालावा लागत आहे. त्यात सबवे बांधून फक्त शोभेपुरते ठेवण्यात आलेले आहेत. त्याचा वापर कळंबोली आणि कामोठेकरांना करता येत नाही. याबाबत कार्यवाही होत नसल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.>सामाजिक संस्थेचाही पाठपुरावाकामोठे येथील सबवे बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. महिला, मुले त्याचबरोबर ज्येष्ठांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. रिक्षावाले अडून बसतात त्यामुळे खिशाला मोठा भुर्दंड बसतो. मात्र, सा. बां. विभाग झोपेचे सोंग करीत असल्याचा आरोप अस्मिता सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे यांनी केला आहे. आम्ही महिला या विभागाला अल्टिमेटम देणार आहोत. त्या कालावधीत किमान कामोठ्याचा सबवे सुरू झाला नाही तर महिलांचे अनोेखे आंदोलन करून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधू, असा इशारा जगदाळे यांनी दिला आहे.>सबवे अद्याप वापराकरिता खुले झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आतमध्ये पाणी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या कामाकरिता लवकरच निविदा काढण्यात येणार त्यानंतर ठेकेदार नियुक्त करून सबवे खुले करण्यात येतील.- एस. व्ही. अलगुट,उपअभियंता, सा.बा.विभाग.