शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग पाण्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:34 IST

पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे वसाहतीलगत बांधण्यात आलेले सबवे पाण्यात गेले आहेत. त्यामुळे त्याचा तीन वर्षांनंतरही वापर सुरू झालेला नाही. या कारणाने कळंबोली-कामोठेकरांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. बी.ओ.टी. तत्त्वावर सायन-पनवेल टोलवेज कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यानुसार २३ कि.मी. लांबीचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. परंतु बहुतांशी काम बाकी असताना शासनाने या कंपनीला टोल वसुली करण्यास परवानगी दिली. कळंबोली, कामोठे, पुरुषार्थ पेट्रोलपंप येथे बांधण्यात आलेले तीन सबवे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महामार्ग ओलांडताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. टोल सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. आता हे मार्ग बांधून पूर्ण झाले असले तरी आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांकरिता हे भुयारी मार्ग खुले करण्यात आलेले नाहीत. यामुळे कळंबोली आणि कामोठे वसाहतीतून येणाऱ्या- जाणाºयांना महामार्ग क्र ॉस करावा लागत आहे. भरधाव वेगाने येणाºया वाहनांमुळे अनेकदा लहान- मोठे अपघात घडतात, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. भुयारी मार्ग पाण्यात बुडून ठेवले आहेत त्याबाबत हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे सायन-पनवेल टोलवेज कंपनी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून शासनाच्या नावाने खडे फोडत आहे. तीनही ठिकाणी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत. महामार्गालगत सर्व्हिस रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. या विरोधात आंदोलन झाले त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र तरीही कामोठे वसाहतीतून आजही मुंबई बाजूकडे जाता येत नाही. त्यासाठी दोन कि.मी. वळसा घालावा लागत आहे. त्यात सबवे बांधून फक्त शोभेपुरते ठेवण्यात आलेले आहेत. त्याचा वापर कळंबोली आणि कामोठेकरांना करता येत नाही. याबाबत कार्यवाही होत नसल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.>सामाजिक संस्थेचाही पाठपुरावाकामोठे येथील सबवे बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. महिला, मुले त्याचबरोबर ज्येष्ठांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. रिक्षावाले अडून बसतात त्यामुळे खिशाला मोठा भुर्दंड बसतो. मात्र, सा. बां. विभाग झोपेचे सोंग करीत असल्याचा आरोप अस्मिता सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे यांनी केला आहे. आम्ही महिला या विभागाला अल्टिमेटम देणार आहोत. त्या कालावधीत किमान कामोठ्याचा सबवे सुरू झाला नाही तर महिलांचे अनोेखे आंदोलन करून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधू, असा इशारा जगदाळे यांनी दिला आहे.>सबवे अद्याप वापराकरिता खुले झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आतमध्ये पाणी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या कामाकरिता लवकरच निविदा काढण्यात येणार त्यानंतर ठेकेदार नियुक्त करून सबवे खुले करण्यात येतील.- एस. व्ही. अलगुट,उपअभियंता, सा.बा.विभाग.