शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बेकायदा रिक्षा स्टॅण्डचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 03:48 IST

आरटीओचे दुर्लक्ष : नेरुळमध्ये वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबई : शहरातील रिक्षांची संख्या वाढत आहे; परंतु अधिकृत रिक्षा स्टॅण्डची संख्या कमी असल्याने शहरातील अनेक भागात बेकायदेशीरपणे रिक्षा स्टॅण्डची निर्मिती करण्यात आली आहे. नेरुळ भागात रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. बेकायदा रिक्षा स्टॅण्डकडे आरटीओचे दुर्लक्ष झाले असून, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत असून पादचारी त्रस्त झाले आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षा व्यवसायाचा समावेश असून, नवी मुंबई शहरातील प्रवासी रिक्षा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर २०१७ पूर्वी १२९९० अधिकृत रिक्षा होत्या. त्या वेळी १६२ अधिकृत रिक्षा स्टॅण्ड होते. शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यावर नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये रिक्षांच्या संख्येत सुमारे चार हजारांहून अधिक संख्येने वाढ झाली; परंतु स्टॅण्डची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा रिक्षा स्टॅण्डची निर्मिती केली आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला स्थानकाबाहेर तीन अधिकृत वाहन पार्किंग तळ आहेत, यामधील जागेत काही ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जात असून याच भागात चारहून अधिक रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. यामधून रेल्वेस्थानकात वाट काढत प्रवाशांना रेल्वे स्थानकात ये-जा करावी लागत आहे, तसेच अनेक सिडको आणि खासगी वसाहती, शाळा, महाविद्यालयांबाहेरही रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत, यामुळे वर्दळीच्या वेळी नागरिकांना वाहतूककोंडी सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरटीओने बेकायदा रिक्षा स्टॅण्डवर कारवाया कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदा रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत, यामुळे रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी नागरिकांना, प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. रिक्षा संघटनांनी आरटीओकडे अधिकृत रिक्षा स्टॅण्डची मागणी करावी.- किशोर पवार, प्रवासी, नेरु ळ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई