शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रिक्षा स्टॅण्डचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 03:48 IST

आरटीओचे दुर्लक्ष : नेरुळमध्ये वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबई : शहरातील रिक्षांची संख्या वाढत आहे; परंतु अधिकृत रिक्षा स्टॅण्डची संख्या कमी असल्याने शहरातील अनेक भागात बेकायदेशीरपणे रिक्षा स्टॅण्डची निर्मिती करण्यात आली आहे. नेरुळ भागात रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. बेकायदा रिक्षा स्टॅण्डकडे आरटीओचे दुर्लक्ष झाले असून, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत असून पादचारी त्रस्त झाले आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षा व्यवसायाचा समावेश असून, नवी मुंबई शहरातील प्रवासी रिक्षा पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर २०१७ पूर्वी १२९९० अधिकृत रिक्षा होत्या. त्या वेळी १६२ अधिकृत रिक्षा स्टॅण्ड होते. शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यावर नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये रिक्षांच्या संख्येत सुमारे चार हजारांहून अधिक संख्येने वाढ झाली; परंतु स्टॅण्डची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी रहिवासी सोसायट्या, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा रिक्षा स्टॅण्डची निर्मिती केली आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला स्थानकाबाहेर तीन अधिकृत वाहन पार्किंग तळ आहेत, यामधील जागेत काही ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जात असून याच भागात चारहून अधिक रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. यामधून रेल्वेस्थानकात वाट काढत प्रवाशांना रेल्वे स्थानकात ये-जा करावी लागत आहे, तसेच अनेक सिडको आणि खासगी वसाहती, शाळा, महाविद्यालयांबाहेरही रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत, यामुळे वर्दळीच्या वेळी नागरिकांना वाहतूककोंडी सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरटीओने बेकायदा रिक्षा स्टॅण्डवर कारवाया कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदा रिक्षा स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत, यामुळे रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी नागरिकांना, प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. रिक्षा संघटनांनी आरटीओकडे अधिकृत रिक्षा स्टॅण्डची मागणी करावी.- किशोर पवार, प्रवासी, नेरु ळ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई